मोबाईल खाली ठेव... जास्त वेळ टीव्ही बघू नको.. असं आपण रागवून म्हणतो..पण त्याचा पर्याय म्हणून आपण त्यांच्या आवडीचं असे काहीतरी द्यायला हवे आहे. मुलांना दिशा दाखवायला हवी आहे. संस्कार शिबिरात मुलांना जरूर पाठवा. पण हे लक्षात ठेवा की खरे संस्कार घरातच होतात.
यातून पाणीसंकटावर मात करणे शक्य
जीवनामध्ये पाणी खूप गरजेचे आहे ‘पाणी हेच जीवन’ आहे. त्यामुळे या अत्यावश्यक गोष्टीचे योग्य नियोजन गरजेचे आहे, जर पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही तर खूप मोठे संकट येऊन उभे राहील. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे.
-अक्षय गेजगे, सिवूडस, नवी मुंबई.
ऋतू असो वा आपत्ती.. नियोजन गरजेचेचआपल्या शहरात तसेच संपूर्ण भारत देशामध्ये करोना विषाणू संसर्गाने हाहाकार माजवला. अनेक निष्पाप नागरिकांचे बळी घतले. कोरोना काळात वैद्यकीय व्यवस्थेवर ताण येऊन दुसऱ्या करुणा लाटेमध्ये ऑक्सिजन बेड्स तसेच वेक्सिंन यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली. त्याचा नागरिकांना खूप त्रास झाला.