उरण मधील वीज समस्येवर शिवसेना आक्रमक
समस्या निवारणासाठी ३० जुलैपर्यंत मुदत
उरण : उरण शहरात तसेच ग्रामीण भागात वारंवार जाणारी वीज, तुटलेले आणि मोडकळीस आलेले विजेचे खांबे, लोंबकळत असलेल्या वीजवाहक तारा, अनेक ठिकाणी नवीन खांबे बसविणे, स्वतंत्र वीज उपकेंद्राची निर्मिती, विविध गावांमध्ये विजेचा प्रवाह कमी दाबाने आणि सुरळीत वीज प्रवाह न होणे, कर्मचाऱ्यांची आरेरावी, कर्मचाऱ्यांमार्फत कामे वेळेत न होणे, कामे व्यवस्थित न होणे, ग्राहकांच्या घरी ग्राहकांची परवानगी न घेता ‘अदानी'चे वीज मीटर बसविणे, २-३ वर्षाची एकदाच पेनल्टी घेणे, ग्राहकांना भरमसाट बिले देणे, ग्राहकांना विना कारण धमकाचण्याचे प्रकार, कर्मचाऱ्यांची कमतरता, अधिकारी-कर्मचारी यांचे नागरिकांच्या समस्याकडे वेळोवेळी होणारे दुर्लक्ष, पत्रव्यवहार करुनही समस्या न सुटणे, ग्राहकांनी वीज वितरण कार्यालयात फोन केला तरी कर्मचाऱ्यांनी फोन न उचलणे, ग्राहकाने सांगितलेला आणि केलेल्या पत्रव्यवहाराला वेळेत प्रतिसाद न देणे, वारंवार वीज जात असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना न करणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा, अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे ढिसाळ आणि बेजबाबदार कारभार याचा निषेध करण्यासाठी ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष'च्या वतीने माजी आमदार तथा रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वात उरण-कोटनाका येथील ‘महावितरण'च्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘महावितरण'चे अतिरिवत कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांना घेराव घालत जनतेच्या गोरगरीबांच्या समस्या त्वरित सुटाव्यात. तसेच ३०० युनिट पर्यंत सर्वांना बिल माफ करण्यात यावे यासह इतर मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी माजी आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक बी. एन. डाकी, सरपंच भास्कर मोकल, भारतीय विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील, आदि पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने उरण मधील ग्राहक आणि रहिवाशांना भेडसावणाऱ्या वीज समस्या ‘महावितरण'चे अतिरिवत कार्यकारी अभियंता विकास गायकवाड आणि इतर अधिकाऱ्यांसमोेर मांडल्या. ‘महावितरण'च्या माध्यमातून जनतेला, ग्राहकांना कसा नाहक त्रास होतो, याचा पाढाच शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यानी यावेळी वाचला. तसेच उरण शहर आणि उरण ग्रामीण भागातील वीज समस्या का सुटत नाही? याबाबत जाब विचारण्यात आला.
यावर माहिती देताना अतिरिक्त कार्यकारी अभियंता विकास गायकवाड यांनी माझी १५ दिवसांपूर्वीच येथे नियुक्ती झाली असून मी समस्या समजून घेतो आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. अगोदरची रखडलेली सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. प्रत्येक ग्रामपंचायतीला तसेच सरपंच यांना भेट देऊन त्या त्या गावातील वीज समस्या प्राधान्याने सोडवविण्यात येतील. ग्राहकांना, जनतेला त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ; फवत आम्हाला काही वेळ द्या. ठरलेल्या वेळेत कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करु, असे आश्वासन अतिरिक्त कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले आहे. सर्व समस्या सोडविण्यासाठी किमान २० दिवसांचा अवधी देण्याची विनंतीही गायकवाड यांनी शिष्टमंडळाला केली आहे.
यावर ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने देखील समस्या निवारणासाठी अतिरिवत कार्यकारी अभियंता गायकवाड यांनी विनंती केल्यानुसार येत्या ३० जुलै पर्यंत २० दिवसांची मुदत दिली आहे. दरम्यान, दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी ‘शिवसेना'च्या शिष्टमंडळाने दिला.
दरम्यान, या आंदोलनप्रसंगी शिवसेना तालुका संपर्क प्रमुख दिपक भोईर, गटनेते गणेश शिंदे, उपतालुका संघटक के. एम. घरत, युवा नेते रुपेश पाटील, ‘नागांव'चे सरपंच चेतन गायकवाड, कोप्रोली शाखाप्रमुख रवि म्हात्रे, उपतालुका संघटिका सुजाता पाटील, माजी तालुकाप्रमुख रंजना तांडेल, शहरसंघटक महेश वर्तक, माजी संघटक प्रवीण मुकादम, शहर संघटक वीणा तलरेजा, मेघा मस्त्री, सोनाली म्हात्रे, कळंबूसरेच्या सरपंच उर्मिला नाईक, गोवठणेच्या सरपंच प्रणिता म्हात्रे, वशेणीच्या सरपंच अनामिका म्हात्रे, ॲड. मच्छिन्द्र घरत, योगिता पाटील, आदि पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.