कामगारांअभावी ५० टक्के पॉवरलूम कारखाने बंद

भिवंडी : भिवंडी मधील पॉवरलूम कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा भ्रमनिरास होत असून कारखान्यांमध्ये सुविधांचा अभाव, वेळेची अनियमितता आणि कारखान्यांमधील दैनंदिन कर्कश आवाज यामुळे कामगार आता इतर कामांकडे झुकत आहेत. परिणामी, कामगारांअभावी ५० टक्के कारखाने बंद पडले आहेत. ज्यामुळे कापड उत्पादनावर वाईट परिणाम होत आहे. या सर्व बाबींमुळे आजकाल कापड उद्योग बॅकफुटवर येत आहेत, जो कारखानदार मालकांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे.

भिवंडी मधील ‘शांतीनगर पॉवरलूम वेल्फेअर असोसिएशन'चे अध्यक्ष मन्नन सिद्दीकी यांनी सांगितले की, भिवंडी आशियातील सर्वात मोठे पॉवरलूम शहर आहे. जिथे शहर आणि जवळच्या भागात ७ लाख पॉवरलूम चालत असत, जे संपूर्ण देशाच्या तुलनेत ३३ टक्के आहे. येथील कापड उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे १० हजार कोटी रुपयांची होती. भिवंडीमध्ये सदर उद्योग ७०० चौरस कि.मी.मध्ये पसरलेला आहे. पॉवरलूम उद्योग येथे मोठ्या संख्येने कामगारांना रोजगार प्रदान करतो. येथे काम करणारे बहुतेक कामगार इतर राज्यांमधून येतात आणि १२ तासांच्या दोन शिपटमध्ये खूप कठोर परिश्रम करतात.

भिवंडीमध्ये दररोज ४२० लाख मीटर राखाडी कापड तयार होते, जे रंगकाम आणि छपाईसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात पाठवले जाते. तसेच येथून तयार झालेले कापड देशभर विकले जाते. परंतु, कामगारांच्या कमतरतेमुळे आता या उद्योगावर वाईट परिणाम होत आहे. कामगारांच्या कमतरतेमुळे ५० टक्के कारखाने कायमचे बंद पडले आहेत. त्यामुळे आता येथे फक्त ३ लाख पॉवरलूम चालू आहेत. याबाबत आरके टेक्सटाईलचे मालक राकेश केसरवानी म्हणतात की, पूर्वी जिथे एक कामगार ६ लूम चालवत असे, आता एक कामगार १२ लूम चालवतो. असे असूनही कारखान्यांमध्ये काम करण्यासाठी कामगार उपलब्ध नाहीत. कामगारांच्या कमतरतेमुळे लूम कारखाने मालक त्यांच्या ऑर्डर पूर्ण करू शकत नाहीत. यामुळे मालकांना स्वयंचलित लूम बसवण्याशिवाय किंवा व्यवसाय बदलण्याशिवाय पर्याय नाही.

सुविधांचा अभाव; कामगारांचा नोकऱ्या बदलण्याकडे कल...

लूम कारखान्यात काम करणारा संदीपने सांगितले की, वर्षानुवर्षे चालणाऱ्या लूम कारखान्यांमध्ये कामगारांसाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. कारखान्यांमध्येही कामगारांसाठी पंखे आणि पाण्याची व्यवस्था नाही. एवढेच नाही तर मालक कामगारांना फॅक्टरी कायद्याची कोणतीही सुविधा देत नाहीत. कामगारांना ना पीएफ मिळत आहे, ना ईएसआयसी. प्रामाणिकपणे काम करुनही कामगारांना रोजंदारी कामगारांसारखे वागवले जाते. यामुळे कामगार लूम कारखान्यांमध्ये काम करण्यास कचरतात. याउलट गोदाम क्षेत्रात काम करुन त्यांना जास्त पगार मिळतो. तसेच तेथे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. यामुळे सुशिक्षित लोक कारखान्यांमध्ये काम करत नाहीत. भिवंडी आशियातील सर्वात मोठे केंद्र बनले आहे. पण, जेथे २४ तास काम असते आणि सर्व सुविधा उपलब्ध असतात. यामुळे, लोक अशा कामाकडे अधिक वळत आहेत.

औद्योगिक वापरासाठी ७ टक्के जमीन...
भिवंडी महापालिकेच्या विकास आराखड्यात प्रस्तावित केलेल्या जमीन वाटपानुसार ४६ टक्के म्हणजेच १,२२० हेक्टर जमीन निवासी वापरासाठी देण्यात आली आहे. ७ टक्के जमीन औद्योगिक वापरासाठी, ३ टक्के म्हणजे ७६ हेक्टर जमीन मिश्र वापरासाठी आणि १०० हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी, खुल्या जागा आणि उद्याने आणि बागा यासारख्या मनोरंजन स्थळांसाठी देण्यात आली आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालात असे म्हटले आहे की, डोंगराळ क्षेत्र आणि वनक्षेत्राचे क्षेत्रफळ ११ टक्के म्हणजेच २९० हेक्टर आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

लोंबकळणाऱ्या तारांवर महापालिका तर्फे कारवाई