मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावात पाण्यासाठी बोंबाबोंब -वैशाली दरेकर

डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये कुठलाच विकास झालेला नाही. ‘मेट्रो'साठी डिव्हाइडर्स मध्ये खड्डे खोदून पिलर उभा करण्यात आला. पण, अशा डिव्हाइडर्स मध्ये ‘मेट्रो'चा पिलर उभा राहू शकतो का? येथे कुठलाच विकास झाला नाही, फक्त बॅनरबाजी होत आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्तक घेतलेल्या गावात पिण्यासाठी पाणी नाही. आजही येथील महिला डोक्यावर हंडा घेऊन गावोगाव पाण्यासाठी भटकत आहेत. विरोधकांना विकास कुठे दिसतो? अशी टिका ‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'मधील ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी मेळाव्यात केली.

७ रोजी दावडी येथील पाटीदार भवन येथे ‘महाविकास आघाडी'तर्फे कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वैशाली दरेकर बोलत होत्या. याप्रसंगी गटनेते गुरुनाथ खोत, ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट'चे प्रवक्ते महेश चेचे, धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख हर्षवर्धन पालांडे, रमेश जाधव, शहरप्रमुख शरद पाटील, ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, ‘राष्ट्रवादी'चे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील, ‘आरपीआय निकाळजे गट'चे जिल्हाध्यक्ष धर्मा वख्ते, ‘आप'चे जिल्हाध्यक्ष धनंजय जोगदंड, माजी नगरसेवक संतोष केणे यांच्यासह ‘महाविकास आघाडी'मधील घटक पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रचार यात्रांवेळी लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून या वेळेला लोकांना परिवर्तन हवे असून त्यासाठी मतदार ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे गट'च्या मशालीलाच मतदान करणार आहेत, असे वैशाली दरेकर म्हणाल्या.

सदर बैठकीमध्ये उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी लोकांसमोर नेमके काय मुद्दे घेऊन जावे या विषयावर नेते आणि कार्यकर्ते यांनी आपापले म्हणणे मांडले.

दरम्यान, ‘महाविकास आघाडी'च्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांच्या प्रचारासाठी येत्या १३ मे रोजी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची डोंबिवली मधील ह.भ.प. संत सावळाराम म्हात्रे महाराज क्रीडा संकुल येथे जाहीर सभा होणार आहे. तर १७ मे रोजी ‘राष्ट्रवादी'चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार मुंब्रा-कळवा परिसरात सभा घेणार आहेत. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मुंबई शिक्षक व पदवीधर,कोकण विभाग पदवीधर