सिडकोने खारघर हिल वरील नेचर पार्कचा प्रकल्प गुंडाळला
खारघर परिसरातील गावे ,आदिवासी पाडे तसेच शिरवणे ,नेरुळ कुमशेत आदी गावे आणि नेरुळ तुर्भे एमआयडीसी मधील असलेल्या झोपडपट्टीतील काही नागरिक खारघर टेकडीवरील झाडांची कत्तल करून त्याचा उपयोग स्वयंपाकसाठी करीत असे, दरम्यान सिडकोने ठाणे आणि पनवेल वनविभागाच्या सहकार्याने नवी मुंबईतील निसर्गाची जपणूक व संवर्धन करण्यासाठी डोंगर माथ्यावर विस्तीर्ण नेचर पार्क या प्रकल्पाच्या माध्यमातून ऐंशी हजार झाडे,तलाव,बंधारे उभारले होते. वृक्षारोपणा बरोबरच ,जमिनीचे भूस्खलन थांबवणे,वणव्यापासून आदी कामामुळे खारघर डोंगरावर हिरावाई पसरली होती. सिडकोने हा प्रकल्प गुंडाळल्याने खारघर डोंगरावर होणारी वृक्ष तोड,नागरिकांच्या पार्ट्या करताना दारूच्या बाटल्या,प्लास्टिक खारघर डोंगराला पूर्वी सारखे दिवस येणार येतील आणि त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होवू शकते. या विषयी वन विभागाच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता, लावलेली झाडे वाचविण्यासाठी सिडकोने परिसरातील पाड्यातील आठ ते दहा व्यक्तींची ठोक मानधनावर सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करून डोंगराचे जतन करावे. सिडकोने त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात खारघर टेकडीचे सपाटीकरण व्हायला वेळ लागणार नाही.
सिडकोच्या पर्यावरण विभागातील अधिकारी कर्मचारीकडे विचारणा केली असता, ज्या अधिकाऱ्याचा काळात हा प्रकल्प सुरु झाला होता. त्या अधिकाऱ्यांची राज्यात इतर ठिकाणी बदली झाली आहे. तसेच सिडकोला खारघर टेकडीवरील पर्यावरणाचे संवर्धन करावयाचे असेल तर त्या ठिकाणी पदपथ, बसण्यासाठी बाकडे आदी कामे करू नये टेकडी आहे. त्या परिस्थितीत ठेवून डोंगरावरील वृक्ष तोड होवू नये तसेच डोंगरावर पार्ट्याना बंदी घालावी.त्यासाठी सिडकोने कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा काही कामगाराची नेमणूक करून डोंगरावरील पर्यावरण ठिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे.