समाजात एकता महत्वाची - स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर 

खारघर : खारघर परिसरात बंजारा समाजाचे जेंव्हा जेव्हा कार्यक्रम होतात. त्यावेळी बंजारा समाज मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. अशीच एकता टिकवून ठेवा असा सल्ला पनवेल पालिका स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर यांनी दिला. यावेळी नगरसेवक निलेश बाविस्कर, नवी मुंबई महानगरपालिका एलबीटी विभागाचे अधिकारी आर आर जाधव, भाजपचे शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, संतोष राठोड, सुभाष राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

    श्री संत सेवादास बहुउद्देशीय बंजारा समाज उन्नती मंडळाच्या वतीने खारघर मध्ये नुकतीच  संत सेवालाल महाराज यांची 283  वी जयंती सोहळा संपन्न झाला यावेळी उपस्थित समुदायाना मार्गदर्शन करीत असताना वरील सल्ला दिला. खारघर मध्ये वर्षभरात बंजारा समाज कडून होळी, तिज उत्सव, जयंती उत्सव, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची पुण्यतिथी असे अनेक उपक्रम होतात. त्यावेळी सर्व समाज एकत्र येतो. अशामुळे समाजात एकता टिकून असते, सलोख्याचे संबंध निर्माण होतात ही चांगली बाब असल्याचे  नरेश ठाकूर यांनी सांगितले. या कार्यक्रमात खारघर, तळोजा, नावडे, कळंबोली आदी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी कांदा बटाटा व्यापारी संप मागे घेण्याच्या तयारीत