पोलीस चौक्या लुप्त

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या चौक्या नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या दुर्लक्षितपणामुळे अडचणीच्या विळख्यात

उरण : उरण तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या पोलीस चौक्या वापराविना पडून आहेत. तर समुद्र - खाडीकिनारी ठेवण्यात आलेले कंटेनरची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या चौक्या या नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या दुर्लक्षितपणामुळे अडचणीच्या विळख्यात सापडलेल्या आहेत.

मुंबई शहरावर अतिरेकी हल्ला हा समुद्र मार्गाने झाला होता.त्यामुळे मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्यातील नागरिकांच्या सोयीसाठी, कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीमुंबई पोलीस आयुक्तांनी बोकडविरा,दिघोडे,दिघाटी, घारापुरी,उलवे या नाक्यावर पोलीस चौक्या उभारल्या,तसेच पिरवाडी चौपाटी ,वशेणी या समुद्र - खाडीकिनारी कंटेनर मध्ये पोलीस चौक्या उभारल्या आहेत.मात्र गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उभारण्यात आलेल्या पोलीस चौक्या कडे नवीमुंबई पोलीस यंत्रणेला लक्ष केंद्रित करण्यास वेळ न मिळाल्याने आज सदर पोलीस चौक्या लुप्त होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यामुळे गुन्हेगारी रोखणार कशी असा सवाल जनमानसात सध्या विचारला जात आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

अंमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांची पुन्हा धडक कारवाई