ऐन दिवाळीत ऐरोली आणि रबाळेमध्ये दोन व्यक्तींनी केली आत्महत्या  

नवी मुंबई : ऐन दिवाळी सणामध्ये रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत रबाळे आणि ऐरोली भागात राहणा-या दोन व्यक्तींनी मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगिलते.  

शुक्रवारी दुपारी ऐरोली सेक्टर-10 ए मध्ये घडलेल्या पहिल्या घटनेत बाबु रमा मरांडी (35) या व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाबु मरांडी हा ऐरोली  येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी कामाला होता, तसेच तो त्याच ठिकाणी राहण्यास होता. शुक्रवारी त्याने तेथील बांधकाम साईटवरील रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. हा कामगारांना याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  
शनिवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रबाळे येथील सिद्धार्थ नगर भागत घडलेल्या दुस-या घटनेत निलेश रामचंद्र हेपडे (32) या व्यक्तीने लक्ष्मण निवास या इमारतीजवळ असलेल्या विहीरीत उडी टाकुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन विहीरीत बुडालेल्या निलेश हेपडे याला बाहेर काढुन त्याला रुग्णालयात दाखल केले. या दोन्ही आत्महत्येच्या घटनांची रबाळे पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून दोन्ही आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  

 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

तरुणाला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्याची हत्या