पंतप्रधान मोदींच्या समोर समस्या मांडणार

नवी मुंबई : अखिल भारतीय कश्यप,कहार,निषाद,भोई व कोळी समाजाच्या अडचणी व समस्या मोठ्या प्रमाणात आहेत.त्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करण्यात येईल.तसेच त्या समस्या सुटण्यासाठी v yaa समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान मोदी समोर मांडल्या जातील असे आश्वासन केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी ऐरोली येथे दिले.

ऐरोली येथील ऐरोली स्पोर्ट्स क्लब येथे राष्ट्रीय कोळी महासंघाचे अध्यक्ष,आमदार रमेश पाटील व कोळी महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष विधीज्ञ चेतन पाटील यांच्या वतीने अखिल भारतीय आदिवासी कश्यप,कहार,निषाद,भोई व कोळी समन्वय समितीचे देशस्तरिय १३ वे दोन दिवशीय अधिवेशन सुरू झाले.त्यावेळी उद्घाटनपर भाषणात केंद्रीय राज्य मंत्री साध्वी निरंजन ज्योती बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर जम्मू काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री काविंदरजी गुप्ता,युपीचे राज्य मंत्री रामकेश निषाद,राम गोपाल कश्यप,राज्यसभा खासदार जयप्रकाश निषाद,आमदार गणेश नाईक, आयुर्वेदाचार्य स्वामी गोरखनाथ, माजी आमदार राम कुमार, रघुनाथ कश्यप बरोबरच नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत आयोजक आमदार रमेश पाटील, विधीज्ञ चेतन पाटील सहित राज्यातील आमदार, माजी आमदार, खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार गणेश नाईक यांचे सुध्दा तडाखेबाज भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारने सुरू केलेल्या जन कल्याणकारी योजना बाबत विस्तृत सांगितले. तसेच आयोजक आमदार रमेश पाटील व विधीज्ञ चेतन पाटील यांच्या सामाजिक कामाविषयी कौतुक केले.

या अधिवेशनाचे  उद्दिष्ट्य ज्या राजकीय पक्षात कार्यरत असणाऱ्या समाजाला उमेदवारी मिळवून देणे,त्या नंतर त्याच्या विजयासाठी पूर्ण समाज काम करेल,राष्ट्रीय जनगणना समुदायाच्या आधारावर व्हावी, आरक्षण मिळावे, कश्यप महामंडळाची निर्मिती करणे आदी विषयावर वक्त्यांनी उहापोह केला. तसेच या अधिवेशनात संगठण, राजनैतिक, सामाजिक, न्यायिक, प्रशासनिक, फेडरलिजम या मुद्द्यावर दोन दिवसाच्या अधिवेशनात लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे आयोजक विधीज्ञ चेतन पाटील यांनी सांगितले.

कोट

या दोन दिवसीय अधिवेशनात समाजाच्या विविध मुद्दे,समस्यांवर वक्ते चर्चा करून ठराव मंजूर केले जातील.त्यानंतर पंतप्रधान मोदी,गृह मंत्री अमित शहा यांना मंजूर केलेले प्रस्ताव दिले जातील.तसेच त्यावर कार्यवाही करण्यासाठी विनंती केली जाईल. - आमदार रमेश पाटील, विधानपरिषद

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 514 धोकादायक इमारतींची यादी जाहीर