आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेला देशात तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभल्याची सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहेच. मात्र, यापुढील काळात ते मानांकन उंचाविण्यासाठी आपली जबाबदारीही वाढली असल्याचे मत व्यक्त महापालिका राजेश नार्वेकर यांनी व्यवत केले. दरम्यान, या आधीच्या काळात तत्कालीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या काळात चांगले काम झाले. त्यामुळे आपला बेंचमार्क सेट झाला असून आता त्यापुढे जाऊन प्रगती करण्यासाठी आपण प्रत्येकजण संपूर्ण क्षमतेने काम करेल, असा विश्वासही आयुवत नार्वेक यांनी व्यक्त केला.

आयुक्त राजेश नार्वेकर यांनी महापालिका अधिकारी यांची विशेष बैठक घेत पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि संजय काकडे यांच्या हस्ते अधिकारी वर्गाच्या वतीने आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्याचप्रमाणे नवी मुंबई महापालिकेला नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या ‘स्वच्छ अमृत महोत्सव'मध्ये मिळालेल्या देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे सन्मानचिन्ह, ‘कचरामुक्त शहर'चे फाईव्ह स्टार रेटींग मानांकनाचे सन्मानचिन्ह तसेच ‘इंडियन स्वच्छता लीग'मध्ये युवक सहभागाचे देशातील प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्र या समवेत आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी यांचे समुह छायाचित्र काढण्यात आले.


दरम्यान, यापुढील काळात आयुक्त राजेश नार्वेकर प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे सविस्तर आढावा घेणार असून विविध विभागांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाची पाहणी करणार आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ज्येष्ठ नागरिक दिनी अनुभवसमृध्द पिढीचा गौरव