नवी मुंबई शहर व्हावी टुरिस्ट सिटी...

नवी मुंबई ः देशातील अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षित झाली आहेत, अशा पर्यटनस्थळांची जगाला ओळख व्हावी आणि प्रसिध्द पर्यटन स्थळांच्या ठिकाणी
स्वच्छता राखून नागरिकांना आरोग्यदायी पर्यटन करता यावे अशी संकल्पना डोळ्यांसमोर ठेवून ‘नवी मुंबई प्रेस वलब'ने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पर्यटन... अशा संदेश प्रसारासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातील  ऐतिहासिक स्थळांंना भेटी देण्यासाठी २७ सप्टेंबर पासून अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे.

यंदाचा जागतिक पर्यटन दिन, पर्यटन मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग यांच्याद्वारे विविध उपक्रमांतून साजरा केला जात आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यावर्षीही २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करत असून यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन  केले आहे. युनायटेड नेशन वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन द्वारे सन २०२२ करिता जागतिक पर्यटन दिनाचे घोषवावय पुनर्विचारात्मक पर्यटन घोषित केले आहे. यावर्षी इंडोनेशियातील बाली येथे अधिकृत जागतिक पर्यटन दिन साजरा  केलेला जाणार आहे. त्यामुळे देशाच्या विकासात महत्त्वाचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळांना देश-विदेशातील अधिकाअधिक  पर्यटकांनी भेट देऊन पर्यटन विकासाला मोलाची साथ द्यावी, असे आवाहन ‘नवी  मुंबई प्रेस वलब'ने या निमित्ताने केले आहे.

नवी मुंबई शहर व्हावी टुरिस्ट सिटी...

नवी मुंबई शहर देशातील एक सुनियोजित शहर आहे. येथे बेलापूर किल्लासह  गोवर्धनी माता मंदीर, पावणेश्वर मंदिरापासून ‘सिडको'ने विकसित केलेला
वाशी सी-शोअर, ऐरोली येथील जैवविविधता वेंÀद्र, कोपरखैरणे येथील निसर्ग  उद्यान, खाडीकिनारी पलेमिंगो सफर, गवळीदेव, पांडवकडा धबधबा, चिरनेरचा
महागणपती, उरणचा द्रोणागिरी किल्ला यांसह नवी मुंबईला लागूनच असलेल्या घारापुरी येथील ऐतिहासिक एलिफंटा लेणी यामुळे नवी मुंबई शहर एमएमआर क्षेत्रातील टुरिस्ट सिटी म्हणून विकसित होऊ शकते, असा विश्वास नवी मुंबई  महापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी २७ सप्टेंबर रोजी व्यवत केला. तर
सिडको देखील आता त्या दृष्टीने विचार करणार असल्याचे ‘सिडको'चे  व्यवसथापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.


जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून ‘नवी मुंबई प्रेस वलब'ने स्वच्छ पर्यटन, आरोग्यदायी पयर्टनाच्या संदेश प्रसारासाठी नवी मुंबई ते हंपी-बदामी-चिकमंगलूर-हडेबडी अशी रस्तेमार्गे अभ्यास सहल आयोजित केली  आहे. तिचा शुभारंभ ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी आणिमहापालिका आयुवत अभिजीत बांगर यांनी श्रीफळ वाढवून केला. 

यावेळी नवी मुंबईला टुरिस्ट सिटी म्हणून विकसित करण्याचे निवेदनही ‘प्रेस  वलब'ने उभय मान्यवरांना दिले. नवी मुंबई महापालिका, ‘सिडको'सह महाराष्ट्र
सरकारने टुरिस्ट सिटी म्हणून विकसित करण्याचे निवेदनही डॉ. मुखर्जी आणि बांगर यांना दिले. नवी मुंबई महापालिका, ‘सिडको'सह महाराष्ट्र सरकारने
टुरिस्ट सिटी म्हणून विकसित करावे, अशी ‘नवी मुंबई प्रेस वलब'ची मागणी आहे.

देशातील अनेक पर्यटनस्थळे दुर्लक्षित झाली आहेत. अशा पर्यटनस्थळांची   जगाला ओळख व्हावी आणि प्रसिध्द पर्यटन स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता राखून
नागरिकांना आरोग्यदायी पर्यटन करता यावे अशी संकल्पना डोळ्यासमोर  ठेवून  जागतिक पर्यटन दिनी सहल निघाली आहे. भारतीय पर्यटकांनी जर देशातील पर्यटन
स्थळांच्या ठिकाणी स्वच्छता राखली तर विदेशातील पर्यटकांची आपल्याकडे रिघ लागेल, असे डॉ. मुखर्जी म्हणाले.


याप्रसंगी महापालिका मुख्यालय येथे अतिरिवत आयुवत सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुवत डॉ. बाळासाहेब राजळे, जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे, माजी अतिरिवत आयुवत डॉ. संजय पत्तीवार, आदि उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्थानिक उत्पादने व व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी 'व्होकल फॉर लोकल'