दिघा रेल्वे स्थानकात महिना अखेर लोकलला थांबा?

दिघा रेल्वे स्थानकाचे ९५ %  काम पूर्ण

नवी मुंबई ः ट्रान्स-हार्बर मार्गावर खासदार राजन विचारे यांच्या विशेष प्रयत्नाने सुरु झालेले दिघा रेल्वे स्थानकाचे काम ९५ % पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या महिना अखेरपर्यंत दिघा रेल्वे स्थानक सुरु होण्याची शवयता खासदार राजन विचारे यांनी व्यवत केली. खा. राजन विचारे यांनी ‘मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण'चे (एमआरव्हीसी) अधिकारी आणि शिवसेनाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत १३ फेब्रुवारी रोजी दिघा रेल्वे स्थानकातील कामांची पाहणी केली. याप्रसंगी ‘एमआरव्हीसी'चे मुख्य प्रकल्प अधिकारी बी. के. झा, उपप्रकल्प अधिकारी चौधरी, ‘एमआयडीसी'चे सर्व्हे अधिकारी खैरे, नवी मुंबई महापालिका कार्यकारी अभियंता सोनावणे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुवत गायकवाड, शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, ‘राष्ट्रवादी'चे जिल्हा कार्याध्यक्ष जी. एस. पाटील, माजी शहरप्रमुख मोहन मढवी, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, संतोष घोसाळकर, मिलिंद सुर्यराव, युवा सेना प्रदेश सहसचिव करण मढवी, संघटक चेतन नाईक, शहरप्रमुख विजय माने, प्रविण म्हात्रे, रविंद्र म्हात्रे, उपशहरप्रमुख मंगेश साळवी, सुर्यकांत मढवी, महेश कोटीवाले, डी. आर. पाटील, संजय तुरे यांच्यासह इतर पदाधिकारी-शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ठाणे आणि कल्याण यांना जोडणारा ऐरोली-कळवा एलिवेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाला खा. राजन विचारे यांनी सन २०१४-१५ मधील रेल्वेच्या बजेटमध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून ४२८ कोटींची मंजुरी मिळवली होती. या प्रकल्पाचे भूमीपुजन १० डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात कळवा
एलिवेटेड रेल्वे स्थानक आणि मार्गिकेसाठी १०८० झोपड्यांचे पुनर्वसन करावे लागणार होते. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे जागेच्या भूसंपादन सर्वे करण्यासाठी रेल्वेला अडथळे येत होते. त्यामुळे २० जून २०१७ रोजी तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांची भेट घेऊन पत्राद्वारे संरक्षण देऊन सर्वे करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर झोपड्यांचा सर्वे करण्यात आला. दुसरीकडे सदर प्रकल्प सुरु होण्यास विलंब होत असल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन मंजूर झालेला निधी केंद्र सरकारकडे परतू नये म्हणून आपण सदर प्रकल्पाचे काम दोन टप्प्यात करण्यासाठी ‘एमआरव्हीसी'कडे पाठपुरावा केला. तसेच दिघा रेल्वे स्थानकासाठी जाणारा रस्ता, पाण्याची लाईन, पार्किंग तसेच मलनिःस्सारण लाईन यासाठी आवश्यक असणाऱ्या जागेसाठी एमआयडीसी सोबत बैठका घेऊन परवानगी मिळवून घेतली. अखेर दोन वर्षानंतर प्रत्यक्ष जागेवर ७ मे २०१८ रोजी दिघा रेल्वे स्थानक कामाचे भूमीपुजन करुन स्थानकाचे काम सुरु करण्यात आले. तेव्हापासून कोरोना प्रादुर्भाव कालावधी वगळून दिघा रेल्वे स्थानक उभारणीचे काम सुरु असून सद्यस्थितीत ९५ %  काम पूर्ण झाल्याचे खा. राजन विचारे यांनी सांगितले.


नवी मुंबई शहरात नोकरीनिमित्त कल्याण, डोंबिवली ,अंबरनाथ, बदलापूर येथील नागरिक येत असतात. या रेल्वे प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात येऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील वाशी, पनवेल लोकल पकडावी लागते. त्यामुळे या प्रवाशांचा वेळ, श्रम खर्ची पडत असते. या प्रवाशांना थेट नवी मुंबईमध्ये प्रवेश मिळण्यासाठी ऐरोली-कळवा एलिव्हेटेड प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांचा वाढणारा अतिरिक्त भार देखील कमी होणार आहे. त्यामुळे ठाणे स्थानकातून
प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल. - खासदार राजन विचारे, ठाणे.

नवीन दिघा रेल्वे स्थानकात कसे असणार?
फलाट 1/2 व 3/4
फलाटाची लांबी 270 व रुंदी 12 मीटर
भुयारी मार्ग 5
सरकते जिने 6
लिफ्ट 2
दोन्ही बाजूस पार्किंग व्यवस्था 400+400
दोन्ही बाजूस G+2 इमारत असून त्यामध्ये 6+6 तिकीट खिडकी व कार्यालय
शौचालय 2
पाण्याची सोय (2 वॉटर कुलर फलाट) 1/2 व 3/4

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर