ठाणे जिल्ह्यातील १६ अनाथ चिमुकल्यांना मिळाले आई-वडील
जिल्हाधिकारी दालनात अनुभवले भावस्पर्शी क्षण
ठाणे ः जिल्हाधिकारी यांच्या दालनात १० जानेवारी रोजी एक आगळावेगळा अनौपचारिक असा सोहळा पार पडला. जिल्ह्यातील १६ बालकांना एकाच वेळी कायदेशीररित्या पालक मिळाले. दत्तक आदेश घ्ोताना पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता. तर सदर प्रक्रिया पार पडताना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे देखील भावुक झाले होते.
बाल न्याय (मुलांची काळजी-संरक्षण) अधिनियम २०१५ नुसार अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागीत बालकांचे दत्तक आदेश तसेच नात्यांतर्गत दत्तक आणि सावत्र दत्तक करण्याकरीता दत्तक नियमावली २०२२ तयार करण्यात आली आहे. त्यानुसार सदर आदेश पारीत करण्याची जबाबदारी आता जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी सदर दत्तक आदेश न्यायालयामार्फत केले जात होते. आता मात्र सदर जबाबदारी जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी करुन इच्छुक पालकांकडे दत्तक बालके देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी पालकांना सुपूर्द केले. यावेळी दत्तक घ्ोतलेल्या पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट आणि डोंबिवली येथील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट दत्तक संस्थांनी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली.
याप्रसंगी जिल्हा महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, संरक्षण अधिकारी पल्लवी जाधव, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, नेरुळ येथील चिल्ड्रन ऑफ द वर्ड इंडिया ट्रस्ट दत्तक संस्थेच्या बेट्टी मथाई, डोंबिवलीतील जननी आशिष चॅरिटेबल ट्रस्ट वंदना पाटील, आदि उपस्थित होते.
बालकल्याण समिती ठाणे यांच्या आदेशान्वये या दोन्ही संस्थांमध्ये अनाथ, सोडून दिलेले व परित्यागीत बालकांना दाखल करण्यात येते. CARA (Central Adoption Resource Authority) CARINGs cara.nic.in या संकेतस्थळावर दत्तक इच्छुक पालक नोंदणी करुन ‘कारा'ने दाखविलेले मुलगा किंवा मुलीला पालकांनी राखीव केल्यानंतर दत्तक समितीद्वारे पालकांची मुलाखत घेऊन दत्तक आदेश करिता जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करण्यात येते.
जीवनातील एक वेगळा क्षण...
अनाथ, सोडून दिलेले आणि परित्यागित बालकांना पालक मिळणे, याचा आनंद त्या बालकांच्या चेहऱ्यावर पाहणे क्षण आगळावेगळा आहे. तेे मानवतेचे काम माझ्या सहीने होत असून हा माझ्या जीवनातील अनोखा क्षण असल्याची भावना जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी व्यक्त केली. दत्तक घ्ोणाऱ्या पालकांनी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घ्ोतल्या. यावेळी दत्तक जाणारी बालकेही उपस्थित होती. त्यांच्या हसण्या-खेळण्याने जिल्हाधिकारी यांच्या दालनाला आज वेगळेच रुप आले होते.