नागरिकांना आनंद वाटेल अशाप्रकारे नवी मुंबईचे चित्र बदलून टाका -राजेश नार्वेकर

नवी मुंबई ः शहर स्वच्छतेमध्ये देशात तृतीय क्रमांकाचा उच्च स्तर गाठल्यानंतर तो स्तर उंचाविण्याची आपली जबाबदारी वाढली असून ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जाताना आपल्या कामामध्ये अधिक नीटनेटकपणा आणावा. क्षेत्रीय स्तरापासून महापालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक काटेकोपरपणे आणि गतिमानतेने स्वच्छता आणि सुशोभिकरण कामांकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३' विषयक कामांच्या आढावा बैठकीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रत्येक स्तरावरुन केलेल्या कामाचे निरीक्षण आणि परीक्षण करतानाच या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छताविषयक कामे सुव्यवस्थित रितीने व्हावीत आणि त्यावर सुयोग्य नियंत्रण असावे यादृष्टीने कृती आराखडा मांडला. तसेच वृÀती आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी विभागप्रमुख दर्जाचा नोडल अधिकारी नियुक्त करुन त्यांच्याद्वारे आठवड्यातून एकदा स्वच्छताविषयक कामांचे निरीक्षण केले जाईल. स्वच्छता कामांचा दर्जा राखला जावा याकरिता स्वच्छ भारत मिशनच्या टूलकिटनुसार १४ बाबींची चेकलिस्ट तयार करण्यात आली असून त्या चेकलिस्ट प्रमाणे क्षेत्रीय स्तरापासून मुख्यालय स्तरापर्यंत स्वच्छता निरीक्षणाची जबाबादारी सोपविलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याने तपासणी करावी, असे आयुक्तांनी निर्देशित केले.

यापुढील काळात आठवड्याभरात केलेल्या स्वच्छता कामांचा प्रत्येक मंगळवारी आयुक्तांमार्फत विभागनिहाय आढावा घ्ोतला जाणार असून त्यासोबतच आयुक्त विभागवार भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी देखील करणार आहेत.
स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरण देखील एक महत्वाचा भाग असून सुशोभिकरणाची कामे तत्परतेने सुरु करावीत. त्यामध्ये मागील वर्षीच्या चांगल्या चित्रभिंती धुवून घ्ोणे, आवश्यकतेनुसार काही चित्रभिंतींची पुनर्रंगरंगोटी करणे आणि नव्या संकल्पना राबवून काही चित्रभिंती नव्याने निर्माण करण्याचे आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले. याशिवाय शिल्पाकृतींची डागडुजी तसेच कारंजे दुरुस्ती करुन ती कार्यान्वित करण्याची कार्यवाही तातडीने करावी. सुशोभिकरण कामांचा प्रभाव प्रथमदर्शनी नजरेत भरेल अशा दृश्य स्वरुपात साकारला पाहिजे. नागरिकांना आनंद वाटेल अशाप्रकारे नवी मुंबईचे चित्र बदलून टाका, अशा सूचना आयुवत नार्वेकर यांनी बैठकीत केल्या.

स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या मानांकनात नवी मुंबईकर नागरिकांच्या सहभागाचा महत्वाचा वाटा असून प्रत्येक विभागात आठवड्यातून किमान एक स्वच्छता विषयक उपकम लोकांच्या सहभागातून राबवावा आणि त्याला व्यापक प्रसिध्दी द्यावी अशाही सूचना आयुक्तांनी याप्रसंगी केल्या. स्वच्छतेच्या अनुषंगाने कोणत्या बाबींची तपासणी करायची याविषयी सादरीकरणाद्वारे बाबनिहाय सविस्तर माहिती देण्यात आली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक भाग सिडको, एमआयडीसी, पीडब्ल्यूडी, एमएमआरडीए, एपीएमसी, एमएसईडीसी अशा विविध प्राधिकरणांकडे असून त्यांनाही शहर स्वच्छतेचे महत्व जाणवून देण्याची गरज आहे. या प्राधिकरणांसमवेत तत्परतेने स्वच्छता विषयक चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्याचे आयुक्त नार्वेकर यांनी सूचित केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

फुंडे हायस्कुलच्या पंच्याहत्तरीतील माजी विद्यार्थ्यांची नढाळ यात्रा