भरतीवेळी २८९ हेवटर पाणजे पाणथळ क्षेत्र शुष्क

भरती प्रवाह बंद;  विमानतळ सुरक्षेसाठीच्या पक्षी अभ्यासावर ‘नवी मुंबई सेझ'चे निर्बंध

नवी मुंबई ः पौर्णिमेची भरती असून देखील पाणजे येथील पाणथळ क्षेत्र बहुतांशपणे शुष्क आहे. २८९ हेक्टर अंतर्गत भरती पाणथळ क्षेत्र शुष्क  राहिल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाणावर निर्बंध येत आहे, असे पर्यावरणवादी समुहांनी नमूद केले आहे.

काही संस्थांच्या हितासाठी अरबी समुद्राच्या अंतर्गत भरती जलप्रवाह खंडीत केल्याचा सदर परिणाम आहे. नवी मुंबई सेझ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या आताताईपणामुळे दुसऱ्या वर्षी देखील हवाई सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केल्या जाणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाण अभ्यासावर विपरीत परिणाम होणे सुरु असल्याचे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने सांगितले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयए) जरी वेगाने काम होत असली तरी विमानांच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण असलेले पक्ष्यांच्या उड्डाणाच्या पध्दतीवरचे संशोधन स्थगित करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान नियंत्रण (एमओइएफसीसी) मंत्रालयाने हस्तक्षेप करुन देखील राज्य शासनाने कोणतीही कृती केलेली नाही, अशी खंत ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यवत केली. दुसरीकडे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ने केलेल्या तक्रारीची दखल घेत ‘एमओइएफसीसी'ने राज्य पर्यावरण विभागाला घेतलेल्या कृतीवरील अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, सदर अहवालाची अजुनही प्रतिक्षा आहे.

‘नवी मुंबई सेझ सुरक्षा'ने बीएनएचएसचे संचालक डॉ. बिवश पांडव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या बीएनएचएस टीमला एका वर्षापूर्वी पक्षांचा अभ्यास करण्यासाठी पाणजे पाणथळ क्षेत्रात प्रवेशाची परवानगी नाकारली होती. तेव्हापासून संशोधकांनी अभ्यास बंद केला आहे. परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याची डॉ. पांडव यांनी स्वतः ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'ला पुष्टी केली आहे. ‘सिडको'ने बीएनएचएसची अशाप्रकारच्या अभ्यास प्रकल्पासाठी नियुक्ती केली होती. नॅटकनेक्ट आणि श्री एकवीरा आई प्रतिष्ठान पाणजे आणि खारफुटींसह उरण पाणथळ क्षेत्राला वाचवण्यासाठी गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून तीव्र अभियान चालवत आहे.


सदर ठिकाणी अतिशय वाईट स्थिती आहे. नरेंद्र टोके ‘महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरण'चे (एमसीझेडएमए) सभासद सचिव देखील आहेत. दुर्दैवाने ‘एमसीझेडएमए'कडे स्वतःचेच आदेश लागू करण्याची यंत्रणा नाही आणि संस्था जिल्हा व्यवस्थापनावर जास्त प्रमाणात अवलंबित आहे, अशी बाब देखील बी. एन. कुमार यांनी टोके यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

यासंदर्भात ‘श्री एकवीरा आई प्रतिष्ठान'चे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते आणि रायगड जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा पाणजे येथील जैवविविधतेवर वारंवार होणाऱ्या आक्रमणांकडे त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. पाण्याने भरलेले पाणजे मासे आणि खेकड्यांचा उत्तम स्त्रोत आहे. सोबत येथे स्थानिक आणि
स्थलांतरीत पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आढळतात, असे पवार म्हणाले.

दरम्यान, बीएनएचएस, कांदळवन सेल आणि पर्यावरणवादी पाणजेला वाचवण्यासाठी निकराचे प्रयत्न करत आहेत. उरणच्या संवेदनशील इकोलॉजीला राखण्यासाठी या संपदेचे जतन करणे आवश्यक आहे. पण, ‘सिडको'ने पाणजे पाणथळ क्षेत्र ‘नवी मुंबई सेझ'ला भाडेपट्ट्यावर दिले असल्याचे बी. एन. कुमार आणि नंदकुमार पवार म्हणाले.

उच्च भरती काळ असून देखील पाणथळ क्षेत्राचा मोठा भाग शुष्क राहिला आहे. २८९ हेक्टर अंतर्गत भरती पाणथळ क्षेत्र देखील शुष्क राहिल्यामुळे स्थलांतरीत पक्ष्यांच्या उड्डाणावर निर्बंध येत आहे. सदर बाब पर्यावरण संचालक नरेंद्र टोके यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांना, नवी मुंबई सेझ आणि ‘सिडको'ला दिलेल्या आदेशाचे उल्लंघन आहे. सदर क्षेत्र सीआरझेडआय-१ क्षेत्र असल्यामुळे जलप्रवाहाला धक्का न पोहोचवण्याची खात्री करण्याचे टोके यांनी संबंधित संस्थांना निर्देश दिले होते. -बी.एन.कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

पाणजे मासेमारी क्षेत्र आहे. पाणथळ क्षेत्र शुष्क झाल्यामुळे साहजिकच पक्ष्यांना लहान मासे आणि शेवाळ मिळेनासे होते, असे ‘सिडको'ने नुकतेच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या दस्ताऐवजात नमू्‌द केले आहे. - नंदकुमार पवार, अध्यक्ष-श्री एकवीरा आई प्रतिष्ठान.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मतदार नाव नोंदणीसाठी विशेष मोहीम