‘एनएमएमटी'चा राष्ट्रीय गौरव
नवी मुंबई ः भारत सरकारच्या गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारितील इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांच्या मार्फत कोची येथे झालेल्या १५व्या ‘अर्बन मोबॅलिटी इंडिया परिषद'मध्ये नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला (एनएमएमटी) ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर (ण्ग्ूब् ैग्ूप् ूप ँोू झ्ल्ंत्ग्म् ऊीीहेज्दीू एब्ेूास्) श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
‘केरळ'चे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केंद्रीय गृहनिर्माण-शहरी विकास राज्यमंत्री ना. कौशल किशोर यांचे हस्ते परिवहन उपक्रमाच्या वतीने सदर राष्ट्रीय गौरवाचा पुरस्कार परिवहन व्यवस्थापक योगेश कडुसकर यांनी कार्यकारी अभियंता यांत्रिकी विवेक अचलकर, मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे, तुर्भे आगार व्यवस्थापक सुनिल जगताप यांच्यासोबत स्विकारला.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या राष्ट्रीय मानाच्या पुरस्काराबद्दल ‘एनएमएमटी'च्या सर्व अधिकारी, कर्मचारीवृंदाचे कौतुक करीत या पुरस्कारामध्ये प्रवासी नागरिकांनी उपक्रमावर दाखविलेल्या विश्वासदर्शक सहकार्याचा मोठा वाटा असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयामार्फत प्रत्येक वर्षी शहरे, मेट्रो कंपन्यांच्या कामगिरीवर आधारित, शहरी वाहतूक आणि सर्वोत्तम प्रकल्पांच्या विविध १२ श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. या अनुषंगाने सर्व राज्ये, मेट्रो, रेल्वे, वाहतूक उपक्रम आदिंकडून विहित नमुन्यात पुरस्कार प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाकडून सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर या श्रेणीत नामांकन नोदविण्यात आले होते.
महापालिका परिवहन उपक्रमाकडून करण्यात येत असलेल्या बस संचलन मध्ये पर्यावरणपुरक इंधनावर चालणाऱ्या बसेसचा जास्तीत जास्त वापर, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी १०० % पर्यावरणपुरक बसेसचे प्रवर्तन, मागील ६ महिन्याच्या कालावधीत ४ पटीने वाढलेली कॅशलेस तिकीट विक्री, प्रवाशी जनतेस सक्षम-सुलभ पध्दतीने प्रवाशी सेवा देण्यासाठी आय.टी.एम.एस. प्रणालीचा वापर, परिपूर्ण प्रशिक्षित चालकांकडून ई-बसेसचे परिचलन सुव्यवस्थितपणे करणे, मागील कालावधीतील प्रति कि.मी. मध्ये झालेली वाढ आणि त्या तुलनेने दैनंदिन बस संचलनातील प्रति कि.मी खर्चात झालेली घट, बाह्यउत्पन्न वाढीसाठी करण्यात आलेले नियोजन-वाणिज्य प्रकल्पांचा विकास अशा विविध बाबीं विचारात घेऊन सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर या प्रकल्पास पुढील फेरीसाठी पात्र करण्यात आल्याने २० ऑक्टोबर २०२२ रोजी नवी दिल्ली येथे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते.
भारत सरकाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारित स्थापन करण्यात आलेल्या इन्स्टिट्युट ऑफ अर्बन ट्रान्सपोर्ट (इंडिया) यांच्या मार्फत ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत १५व्या ‘अर्बन मोबॅलिटी इंडिया परिषद'चे आयोजन बोलगट्टी कोची येथे करण्यात आले होते. या कॉन्फरन्स मध्ये नवी दिल्ली येथे करण्यात आलेल्या यशस्वी सादरीकरणानंतर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमास ‘सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर' या श्रेणीचा राष्ट्रीय प्रथम पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सदर पुरस्कार महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे मार्गदर्शन तसेच परिवहन उपक्रमामध्ये कार्यरत सर्व संवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांचे अथक परिश्रम, परिवहन उपक्रमात कार्यरत कंत्राटदार, त्यांचे कर्मचारी आणि परिवहन उपक्रमाच्या कार्यक्षेत्रातील प्रवाशी जनतेच्या सहकार्याने प्राप्त झाला आहे. -योगेश कडुसकर, व्यवस्थापक-नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम.