स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून 75 देशी वृक्षरोपांची लागवड

‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने शिलाफलक व स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा गौरव

पनवेल : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने संपूर्ण राज्यात व देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश अर्थात’ माझी माती माझा देश’ अभियान राबविले जात आहे. आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयामध्ये आयुक्त तथा प्रशासक श्री.गणेश देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करून , राष्ट्रगीत व राज्यगीत तसेच पंच प्रण प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच स्वातंत्र सैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असणाऱ्या शिलाफलकाचे अनावरण आमदार  प्रशांत ठाकूर , आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर यावेळी मान्यवरांनी या शिलाफलकास पुष्पचक्र वाहिले.  तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महात्सवाचे औचित्य साधून अर्थात 75 देशी वृक्षांचे रोपण करून कळंबोली येथे अमृत वाटिका निर्माण करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ म्हणून दि.बा पाटील विद्यालयामध्ये आमदार प्रशांत ठाकूर ,आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल यांच्या शुभहस्ते  देशी वृक्षांचे वृक्षारोपण करून ‘वसुधा वंदन’ कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी लोकनेते दि.बा पाटील शाळेमधील सर्व शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानंतर आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये ‘वीरों को वंदन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत शहीद सैनिक व स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी  पोलिस उपायुक्त परिमंडळ 2 चे पंकज डहाणे, अतिरीक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते , उपायुक्त अभिषेक पराडकर , मुख्य वैद्यकिय अधिकारी  डॉ. आनंद गोसावी, मुख्य लेखा अधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, कार्यकारी अभियंता संजय कटेकर , महापालिकेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमावेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, ‘आपल्या देशातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मृती आपल्या मनात जागत राहिल्या पाहिजे ,ज्या मातीतून आपण जन्माला आलो ती माती आपल्याला वंदनीय असली पाहिजे….म्हणूनच ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे.  देशापुढे, तरूण पिढीच्या पुढे बालपिढीच्यापुढे आपल्या स्वातंत्र्यसैनिकाचा  सन्मान महापालिका करतेय यातून मोठा संदेश दिला जात असल्याचे सांगितले. यावेळी  त्यांनी पंचप्राण शपथ मधील पाचही मुद्द्यांचे सविस्तर विवेचन करुन प्रतिज्ञेचे महत्व उपस्थितांना स्पष्ट करून सांगितले.

 यावेळी आयुक्त गणेश देशमुख म्हणाले, ‘शालेय विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेत असतानाच ज्यांच्यामुळे आपणाला स्वातंत्र मिळाले ते स्वातंत्र सैनिक कोण होते, स्वातंत्र्यसंग्रामामध्ये आपल्या शहरातील सहभागी झालेल्या स्वातंत्र्यवीरांची माहिती व्हावी या उद्देशाने शासन निर्देशानुसार महानगरपालिकेच्यावतीने लोकनेते दि.बा. पाटील शाळेमध्ये  स्वातंत्र सैनिक आणि शहीद वीरांचा नामोल्लेख असणाऱ्या शिलाफलकाचे अनावरण आज करण्यात आले. या अभियानांतर्गत शासनाच्या पुढील सुचनेनूसार महापालिकेच्या चारही प्रभागातील मातीचे कलश एकत्र करून तो कलश जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. आपल्या प्रमाणेच सर्व राज्यातील ,सर्व जिल्ह्यातून आलेल्या  या मातीमधून राष्ट्रीय स्तरावरती ती एकत्र करून दिल्लीमध्ये त्याचे ‘अमृतवन’ उभारले जाणार आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असणारे हे ‘अमृतवन’ सर्वांसाठी प्रेरणा देणारे असणार आहे.’

या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबियांना सन्मानीत करण्यासाठी फुलांनी सजवलेल्या गाडीतून सन्मानपूर्वक आणणयात आले. तसेच यावेळी आमदार , आयुक्त तथा प्रशासक, माजी महापौर, पोलिस उपायुक्त यांच्या समवेत सर्व स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटूंबियांसाठी अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले होते. अत्यंत भारावलेल्या  वातावरणात पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील शहीद सैनिक विष्णु कदम यांच्या पत्नीचा तसेच 26 स्वातंत्रसैनिकांच्या कुटूंबियांचा मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी अथर्व मिडीया वर्ल्ड यांच्या सहयोगातून राहूल सोनावणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शहीद वीरांना वंदन करत देशभक्तीपर गीते सादर केली.   या वेळी महापालिकेच्या शाळांचे विद्यार्थी, स्वातंत्र्य  सैनिकाचे नातेवाईक, नागरिक, महापालिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘श्रमिक सेना'च्या पाठपुराव्याला यश