शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
‘माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत कोकण विभागीय कार्यशाळा संपन्न
‘अभियान'मध्ये प्रत्येक यंत्रणेने सक्रिय व्हावे -आयुवत डॉ. महेंद्र कल्याणकर
नवी मुंबई ; पर्यावरणातील बदल लक्षात घेता ‘माझी वसुंधरा अभियान ४.०' कार्यक्रम कोकण विभागात वेगाने राबवावा. प्रत्येक यंत्रणेने या ‘अभियान'मध्ये सक्रिय व्हावे, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.
‘माझी वसुंधरा अभियान ४.०'च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि आझादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी माती मेरा देश अभियान'बाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदशन देण्यासाठी जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त २८ जुलै रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालय आणि पनवेल महापालिका यांच्या विद्यमाने पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागस्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेत मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे (पालघर), डॉ. वास्टेवाड (रायगड), पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, विभागीय वन अधिकारी-ठाणे कांचन पवार, विभागीय वन अधिकारी-रायगड स्वप्नील धुरे, पनवेल महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रसाळ, उपायुक्त (सामान्य प्रशासन) मनोज रानडे, उपआयुक्त ( नगरपालिका प्रशासन) रविंद्र जाधव, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, जिल्हा नियोजन अधिकारी ठाणे गणेश जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि.प. ठाणे प्रमोद काळे तसेच कोकण विभागातील सर्व विस्तार अधिकारी, सर्व गट विकास अधिकारी, उपस्थित होते.
कार्यशाळेच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतात्मे तसेच यासारख्या विविध दुर्घटनेतील मृतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली. आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यशाळेचा शुभारंभ झाला.
‘माझी वसुंधरा अभियान ४.०' शासनाचा महत्वपूर्ण कार्यक्रम आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे आवश्यक आहे. शासकीय अधिकाऱ्यांनी मागील वर्षाचे काम किती झाले आहे त्याचा आढावा घेऊन या वर्षी ‘माझी वसुंधरा'चे काम अधिक व्यापक होणे आवश्यक आहे. मेरी मिट्टी मेरा देश अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन अभियान यशस्वी करावे, असे सांगत आयुवत डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये कोकण विभागात शंभर टक्के नोंदणी झाल्याबद्दल सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरी भागात ‘माझी वसुंधरा अभियान' राबविण्याबाबत विशेष मार्गदर्शन केले. देशमुख यांनी यावेळी ‘स्वच्छ भारत मिशन'चे महत्व सांगितले. कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन झाले, त्याबद्दल देशमुख यांनी आयुक्त कल्याणकर यांचे आभार मानले.
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाबाबत ‘जिल्हा परिषद-ठाणे'चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) प्रमोद काळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. प्रधानमंत्री नरेंन्द्र मोदी यांनी ‘माझी वसुंधरा अभियान'संबधी दिलेल्या संदेशाचे काळे यांनी वाचन केले.
पर्यावरण पुरक गणेशात्सवबाबत जिल्हा नियोजन अधिकारी-ठाणे सुरेश जाधव यांनी विशेष मार्गदर्शन केले. ठाणे जिल्हा उप वनसंरक्षक कांचन पवार यांनी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०' अंतर्गत जिल्हा निहाय रोप वाटिका, वन महोत्सव तसेच रोपांबाबत विस्तृत माहिती दिली.
कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी शासकीय यंत्रणांनी केलेल्या उल्लेखनीय कामांची प्रसिध्दी कशी करावी. शासकीय यंत्रणांनी केलेल्या कामाची दखल जनसामान्यांनी घेतली पाहिजे, त्यांचे कौतुक झाले पाहिजे यासाठी प्रसिध्दी माध्यमांचा कसा वापर करावा? याबद्दल मार्गदर्शन केले.
युनिसेफ महाराष्ट्र आणि विभागीय नागरी-पर्यावरण अभ्यास केंद्र, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था, मुंबई यांच्यातर्फे माझी वसुंधरा टुल किट मधील महत्वाचे मुद्दे उपस्थितांसमोर सादर केले. विभागीय वन अधिकारी-रायगड स्वप्निल धुरे यांनी ‘माझी वसुंधरा अभियान'अंतर्गत जिल्ह्याच्या भौगोलिक स्थितीनुसार वृक्ष, रोपे, निवडीबाबत विस्तृत माहिती देऊन जीओ टॅग वृक्षगणना याबाबत मार्गदर्शन केले. तर वसुंधरा टीम समन्वय यांनी ‘माझी वसुंधरा अभियान ४.०' अंतर्गत पंचतत्वांबाबत विस्तृत माहिती आणि सादरीकरण करुन ‘अभियान'मध्ये कशाप्रकारे उत्कृष्टरित्या काम करता येईल. काम करताना येणाऱ्या अडचणींवर कसे मात करता येईल, याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अभियान राबवितांना येणाऱ्या अडचणी बाबत प्रश्नांंचे निराकरण करण्यात आले.