मुंबई-गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे १५ कि.मी.ने कमी; इंधन, वाहतूक खर्च, वेळेची बचत

एमटीएचएल समुद्री पुलाची मुख्य भूमीशी प्रत्यक्ष जोडणी पूर्ण

नवी मुंबई ः मुंबई पारबंदर अर्थात एमटीएचएल प्रकल्प आर्थिक भरभराट आणणारा ठरेल. तिसऱ्या मुंबईची सामाजिक-आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा गेम
चेंजर करेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  व्यक्त केला. तर महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग ‘एमटीएचएल'वरुन जाईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई पारबंदर प्रकल्पांतर्गत (श्ऊप्थ्) या महत्वाकांक्षी समुद्री पुलाची मुख्य भूमीशी (स्ीग्हत्ीह्‌) प्रत्यक्ष जोडणी २४ मे रोजी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. सदर महत्वाकांक्षी प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल, असे देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

याप्रसंगी खासदार राहुल शेवाळे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, ‘एमएमएआरडीए'चे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास, जपानचे
मुंबईतील वाणिज्यिक दुतावास प्रमुख डॉ. फुकाहोरी यासुकाटा, जायकाठच्या भारतातील प्रमुख इव्हा मोतो, प्रकल्प आकारास आणणारे एल ॲन्ड टी, देवू, ‘आयएएचआय'चे अभियंते, तांत्रिक अधिकारी, कर्मचारी, मजूर, आदि उपस्थित होते.

एमटीएचएल प्रकल्प पूर्णत्वास जात आहे याचा अतिशय आनंद होत आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्ग'प्रमाणेच या प्रकल्पाचे भूमीपुजन आणि लोकार्पण यांचा योग जुळून येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांचे भूमीपुजन देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत झाले होते. तर लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

सदर प्रकल्प मुंबई, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक परिस्थिती पालटून टाकणारा ठरणार आहे.  समुद्री पुल साकारण्याचे मोठे आव्हान होते. पण, ते एका सांघिक भावनेने पेलण्यात आले. सदर पुल पुढे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे, आणि मुंबई-गोवा महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यामुळे तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात शैक्षणिक, औद्योगिक आणि सेवा क्षेत्र यांचा विकास होणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

ज्या राज्यात पायाभूत सुविधांचे प्रकल्प वेगाने सुरु असतात त्या राज्याच्या प्रगतीचा वेग चांगला असतो असे नमूद करून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आम्ही राज्यातील कुठलाही प्रकल्प रखडू दिला नाही. मुंबईतील मेट्रोचे प्रकल्पही मार्गी लावले. यामुळे कोट्यवधी प्रवाशांना सुविधा उपलब्ध झाली. अगदी कोव्हीडच्या काळातही ‘एमटीएचएल'चे काम सुरु होते.
त्यामुळेच प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला आहे. त्यासाठी सदर प्रकल्प साकारण्यात योगदान देणाऱ्यांचे कौतुक करावेच लागेल. या प्रकल्पामुळे वेळ, इंधनाची बचत होणार आहे. प्रदुषण रोखले जाणार आहे. प्रकल्प पूर्ण करताना पर्यावरणाच्या समतोलचे भान राखले आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यातून पलेमिंगोचे पक्षांचे अधिवास संरक्षित राहिल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सदर समुद्री पूल अभियांत्रिकीचा चमत्कार समजला जाईल. मुंबई शहर आर्थिक, व्यावसायिक आणि मनोरंजनाची राजधानी आहे. पण, बेटा सारख्या भूप्रदेशामुळे
या गोष्टीच्या वाढीला मर्यादा होत्या. या पुलामुळे सदर अडचणी दूर झाल्या आहेत. आता महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा मार्ग ‘एमटीएचएल'वरुन जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यवत व्ोÀला. गेली तीस पस्तीस वर्षे अशा प्रकारचा पुल केवळ चर्चेतच होता. तो आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि पाठबळाच्या जोरावर पूर्ण होत असल्याचा आनंद असल्याचेही ना. फडणवीस म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्रीनिवासन यांनी प्रास्ताविक केले. तत्पूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते पुलाची जोडणी पूर्ण झाल्याच्या ठिकाणावरुरून प्रकल्पावरील अभियंते, अधिकारी, कर्मचारी यांची बस मार्गस्थ करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यापुढे बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई