महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

उष्माघात मृत्यू प्रकरणः सोहळा आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

नवी मुंबई ः खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी उष्माघातामुळे आजारी पडलेल्या श्री सदस्यांची ‘टीम आप पनवेल-रायगड'च्या वतीने, आप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी एमजीएम रुग्णालय-कंळबोली तसेच टाटा रुग्णालय-खारघर येथे जाऊन त्यांच्या  तब्येतीची विचारपूस केली. तसेच ‘आप'च्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खारघर पोलीस स्टेशन येथे जाऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली.

याप्रसंगी ‘आप'चे महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे, कोकण विभाग संयोजक डॉ. अल्तमश फैजी, पनवेल अध्यक्ष ॲड. जयसिंग जगन्नाथ शेरे, खारघर अध्यक्ष योगेश तिरुवा, रायगड अध्यक्ष मनोज घरत आणि इतर स्थानिक कार्यकर्ते
उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नैना'ची अंमलबजावणी मुदतीत करणे होणार सुकर