नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष ?

अनधिकृत इमारतींवर विनापरवाना मोबाईल टॉवर ?

वाशी ः नवी मुंबई शहरातील इमारतींवर मोबाईल टॉवर बसवण्यास अद्याप अधिकृत परवानगी दिली जात नाही. त्यामुळे मोबाईल कंपन्यानी त्यांचा मोर्चा नवी मुंबई शहरातील अनधिकृत इमारतींकडे वळवला आहे. अनधिकृत इमारतींवर नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध मोबाईल टॉवर उभारले जात आहेत. मात्र, अनधिवृÀत इमारतीवरील मोबाईल टॉवर विरोधात तक्रारी करुन देखील त्या तव्रÀारींकडे महापालिका अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार घणसोली विभागात घडला आहे. त्यामुळे भविष्यात अनधिकृत ‘मोबाईल टॉवर'मुळे कुठली दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण?, असा सवाल तव्रÀारदार नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई शहरातील अनेक अनधिकृत इमारतींवर मोबाईल टॉवर असून, त्याकडे महापालिका प्रशासन डोळेझाक करीत असल्याने एक प्रकारे महापालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे, असे चित्र दिसत आहे. नवी मुंबईतील गावठाण तसेच झोपडपट्टी भागातील अनेक अनधिकृत इमारतींवर मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून, त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे त्रास होऊन अनेक नागरिकांना मोठमोठ्या आजारांना समोरे जावे लागत आहे. मोठ्या मोबाईल कंपन्यांनी नवी मुंबई शहरात घुसखोरी केली असून, अवैधपणे बांधकाम व्यवसायिकांना पैशांचे आमिष दाखवून अनेक अनधिकृत इमारतींवर अवैध मोबाईल टॉवर उभारले जात आहेत. घणसोली गावात देखील असाच प्रकार समोर आला आहे. घणसोली सेक्टर-१६ मधील मिनाक्षी ऑटोमोटिव्ह समोरील एका इमारतीवर मोबाईल टॉवर बसवण्याचे काम सुरु होते. याबाबत येथील रहिवासी शीतल पाटील यांनी मागील एक आठवड्यापासून सदर मोबाईल टॉवरचे काम थांबविण्यासाठी तक्रारी केल्या आहेत. मात्र, सदर मोबाईल टॉवरचे काम पूर्ण होऊन देखील महापालिका प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे सदर मोबाईल टॉवर उभारणीस महापालिका अधिकाऱ्यांचाच आशीर्वाद आहे का?, असा सवाल करत भविष्यात जर या मोबाईल टॉवरमुळे कुठली दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी महापालिका अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा इशारा देखील शीतल पाटील यांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिघा रेल्वे स्थानकातही लोकल थांबणार