महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन

कळंबोलीत महिलेचे ५० हजाराचे दागिने लुटले  

नवी मुंबई  : भाजीपाला खरेदी करणा-या महिलेच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारूंनी खेचुन पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री कळंबोलीत घडली. कळंबोली पोलिसांनी सदर लुटारुंविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  

या प्रकरणातील तक्रारदार महिला प्रभावती मनोहर राजे (४२) या कळंबोली सेक्टर-८ मध्ये राहण्यास असून त्यांचा वडापाव विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी रात्री १०. ३० वाजण्याच्या सुमारास प्रभावती राजे या कळंबोली सेक्टर-५ येथे भाजीपाला व फळे खरेदी करत होत्या. याचवेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने प्रभावती यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र खेचुन पलायन केले. यावेळी प्रभावती यांनी आरडा-ओरड केली, मात्र तोपर्यंत दोघे लुटारु मोटारसायकलवरुन पळून गेले. त्यानंतर त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी लुटारुं विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘सुंदर माझा दवाखाना' अभियानाद्वारे आरोग्य सुविधांचे पालटणार रुप