किसानकनेक्टनची कामोठे व वाशी येथे ताज्या भाजीपाला व फळांची नवीन दालने

किसानकनेक्टनची कामोठे व वाशी येथे ताज्या भाजीपाला व फळांची नवीन दालने

नवी मुंबई : शेतातील ताज्या भाज्या, फळे, ग्रामीण भागातील स्टेपल्स व खाद्यपदार्थांची ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून शेतातून थेट दारी पुरवठा करणाऱ्या किसानकनेक्टने नवी मुंबईतील कामोठे व वाशी येथे नवीन प्रमुख दालने उघडून आपला बाजारपेठीय विस्तार केला आहे.

सीवूड्स, घणसोली, खारघर व सानपाडा या स्टोअर्सनंतर वाशी व आज कामोठे येथे नवी मुंबईत उघडलेले किसानकनेक्टचे हे अनुक्रमे पाचवे व सहावे प्रमुख दालन आहे. वाशी येथे सुमारे ३५० चौरस फूट ते ४५० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेले हे नवीन स्टोअर नवी मुंबईतील वाशी येथील सेक्टर १० मध्ये आहे तर कामोठे येथे सेक्टर ७ मध्ये जुही गार्डन, पोलिस स्टेशनजवळ आहे. किसानकनेक्टने या नवीन स्टोअर्ससह नवी मुंबईतील आपल्या भौगोलिक सेवेची व्याप्ती मजबूत केली आहे.

कामोठे व वाशीतील ही नवीन स्टोअर्स लोकांच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या भाजीपाला, फळे, ग्रामीण भागातील मुख्य पदार्थ आणि खाद्यपदार्थांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उत्तम ठिकाणे असतील. ही स्टोअर्स शेतकऱ्यांच्या शेतातील ताजा, पौष्टिक, आरोग्यदायी आणि वापरण्यास सुरक्षित असा हंगामी, प्रादेशिक आणि स्थानिक भाजीपाला, फळे यांचा पुरवठा करेल. किसानकनेक्ट्ने सकस मातीतून पुनरूपयोगी आणि शाश्वत शेती पद्धतींनी समृद्ध केलेल्या शेतमालाचे उत्पादन व वितरण करण्यावर भर दिला आहे. ही दालने ग्राहकांना एक अनोखा 'टच आणि फील' अनुभव देतील.

फार्म – ते – घरपोच ताज्या भाज्या, फळे आणि अन्न वितरणाच्या क्षेत्रात मजबूत ऑनलाइन उपस्थितीनंतर, किसानकनेक्टने आता ओम्नी – चॅनेल पद्धतीने बाजारपेठेमध्ये पूर्तता करण्याची योजना आखली आहे. याबाबत बोलताना विवेक निर्मळ, सीईओ, किसान कनेक्ट सेफ फूड प्रायव्हेट लिमिटेड म्हणाले, “आमच्या ओम्नी-चॅनेल धोरणाचा एक भाग म्हणून, आम्ही मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमधील महत्त्वाच्या सूक्ष्म बाजारपेठांमध्ये प्रमुख स्टोअर्स उघडत आहोत. ग्राहकांसाठी ताज्या, उच्च दर्जाच्या आणि पौष्टिक अशा विविध प्रकारच्या भाज्या आणि फळे मिळवण्यासाठी विश्वासार्ह, वन-स्टॉप केंद्रे तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

निर्मळ पुढे म्हणाले, “आरोग्य आणि आहारासाठी-जागरूक लोकांसाठी, उत्तम पोषण आणि चवदार पाककृती तयार करण्यासाठी, प्रादेशिक शेतकी उत्पादनांचे स्त्रोत पुरविणे महत्वाचे आहे, जे नैसर्गिकरित्या पुनर्जन्मशील शेती आणि शाश्वत पद्धतींनी थेट शेतातून घेतले जाते. ते लोकांपर्यंत ताजे, स्वच्छ आणि सुरक्षित रीतीने किमान वेळेत पोहोचले पाहिजे. कामोठे, वाशी व परिसरांतील लोकांच्या अन्नाचा दर्जा वाढवण्यासाठी आम्ही भाजीपाला आणि फळे यांचा ताजेपणा देण्यासाठी वचनबद्ध आहोत.”

किसानकनेक्ट शेतकऱ्यांना सामावून घेते. आज 3,000 हून अधिक शेतकऱ्यांचा हा समूह बनला आहे. हे शेतकरी निर्यातक्षम दर्जाचा, चवदार व आरोग्यपूरक अशा शाश्वत भाज्या आणि फळे यांचा पुरवठा करतात. सुरक्षित आणि आरोग्यदायी खाण्याच्या सवयींसाठी सरकारच्या ‘इट राइट इंडिया’ मिशनला पाठिंबा देण्यासाठी ‘इट राइट, फ्रॉम द फार्म’ पद्धती अंगीकृत करण्यावर किसानकनेक्टकडून भर दिला जातो. सध्या किसानकनेक्ट मुंबई आणि पुण्याला फार्म – फ्रेश अशा ताज्या फळभाज्यांच्या पुरवठा करते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संसारासाठी नेटाने व्यवसाय करणाऱ्या माऊलींचा पनवेल तालुका पत्रकार विकास मंचातर्फे सन्मान