महापालिका आयुवतांकडून अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण कार्यवाहीचे निर्देश
नवी मुंबई शहर स्वच्छतेवर अधिक बारकाईने लक्ष द्यावे -आयुवत बांगर
नवी मंबई : पावसाळा कालावधी सरला असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात पावसाळयानंतरच्या सुविधा कामांना गती द्यावी. प्राधान्याने रस्ते सुस्थितीत ठेवावेत, असे निर्देश नवी मुंबई महापालिकेचे प्रभारी आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. दरम्यान, स्वच्छता नवी मुंबईची ओळख असल्याने, शहर स्वच्छतेवर अधिक बारकाईने लक्ष देण्यावर भर द्यावा, असेही आयुवत बांगर यांनी सूचित केले.
पावसाळी कालावधीत रस्ते खराब झाले असल्यास, त्यांची आवश्यक तेथे त्वरित दुरुस्ती करावी आणि नवी मुंबईची प्रतिमा उंचावण्याच्या दृष्टीने रस्ते सुधारणांबाबत गतीमान कार्यवाही करावी. यामध्ये शहरातील ठाणे-बेलापूर मार्ग, पामबीच मार्ग, आम्रमार्ग असे वर्दळीचे मुख्य रस्ते सुस्थितीत ठेवण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याचप्रमाणे सायन-पनवेल महामार्ग जरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असला तरी त्यांच्यामार्फत तत्पर कार्यवाही होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याचेही आयुक्त बांगर यांनी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवी मुंबई दौरा होणे अपेक्षित असून त्या निमित्ताने देशातील आणि राज्यातील अनेक मान्यवर नवी मुंबई शहराला भेटी देणार आहेत. या माध्यमातून नवी मुंबईची स्वच्छ-सुंदर प्रतिमा अधिक उजळून निघण्याची चांगली संधी आहे. त्यादृष्टीने सतर्क राहून अपेक्षित कामे तत्परतेने करावीत. यामध्ये प्रामुख्याने मुख्य रस्त्यांची स्थिती सुधारणे, दुभाजकांमधील स्वच्छता-सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष देणे, पावसाळा कालावधीत दुभाजकांमध्ये आणि रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत काढून टाकून परिसर स्वच्छ करणे, पावसाळ्यात शेवाळामुळे खराब झालेल्या आकर्षक भित्तीचित्रांमध्ये सुधारणा करणे, गतिरोधकांची उंची प्रमाणबध्द करणे अशा विविध छोट्या-छोट्या गोष्टींवर कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी दिल्या.
स्वच्छ शहराच्या लौकिकामध्ये वाढ करण्यासाठी रस्ते स्वच्छतेची गुणवत्ता वाढविण्यावर भर देण्याचे निर्देशित करीत आयुक्त बांगर यांनी सार्वजनिक ठिकाणे कायमस्वरपी स्वच्छ राहतील, याकडे बारकाईने लक्ष द्यावे. अशी ठिकाणे अस्वच्छ असणे शहरासाठी भूषणावह नाही असे सांगत याकडे बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले. तसेच रस्ते दुभाजकांमध्ये पावसाळी कालावधीत गवत साचले असून ते साफ करण्याचे आणि दुभाजक नियमित स्वच्छ राहतील याकडे उद्यान विभागाने विशेष लक्ष द्यावे. तसेच प्राधान्याने मुख्य रस्त्यांवरील दुभाजकांमध्ये अनावश्यक उगवलेल्या गवताचे पातेही राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही निर्देशित करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेकडे सोपविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधा पूर्ततेच्या जबाबदाऱ्या उत्तम रितीने पार पाडण्यासाठी नियोजनबध्द काम करावे. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांनी चोखपणे पार पाडावी. स्वच्छतेमध्ये देशात तृतीय क्रमांकाचे शहर म्हणून नावाजले जाणारे नवी मुंबई शहर नेहमीच स्वच्छ आणि सुंदर दिसते अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून, प्रवाशांकडून मिळत असतात. त्याला साजेसे काम करीत राहणे आपली जबाबदारी आहे. महापालिकेने कामाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सुखद अनुभव प्राप्त करून द्यावा. याद्वारे पंतप्रधान नरंेद्र मोदी यांनाही याची प्रचिती येईल, असे काम करण्यासाठी सज्ज रहावे. -अभिजीत बांगर, प्रभारी आयुवत-नवी मुंबई महापालिका.