ठाणे महापालिकेचा ४१ वा वर्धापन दिन साजरा
ठाणे महापालिकेचा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा
ठाणे : ठाणे महापालिकेचा ४१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयात महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते महापालिका ध्वजाचे आरोहण झाले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, अग्निशमन विभाग प्रमुख गिरीश झळके उपस्थित होते.
त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, एमएसएफ यांनी संचलन केले. या संचलनाचे नेतृत्व जवाहर बाग अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख संदीप कदम आणि बाळवुÀम अग्निशमन केंद्राचे केंद्रप्रमुख प्रकाश काकळीज यांनी केले.
ध्वजारोहण आणि संचलन सोहळ्यानंतर नरेंद्र बल्लाळ सभागृहात पुजनीय नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. याप्रसंगी परिवहन समिती सभापती विलास जोशी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, वर्षा दिक्षीत, अनघा कदम, गजानन गोदेपुरे, उमेश बिरारी, तुषार पवार, शंकर पाटोळे, मुख्य लेखा-वित्त अधिकारी दिलीप सुर्यवंशी, ‘टीएमटी'चे व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, मुख्य आरोग्य अधिकारी चेतना के., मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान तसेच इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी आदि उपस्थित होते.
त्याचप्रमाणे वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महनीय नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. आयुक्त अभिजीत बांगर यांनी मासुंदा तलाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच कोर्ट नाका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.