साता समुद्रापार देखील श्रीगणेशोत्सव जल्लोषात साजरा

वाशी गावातील भगत दांपत्याद्वारे मेलबर्न मध्ये प्रतिष्ठापना

वाशी : महाराष्ट्र राज्यात श्रीगणेशोत्सव सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यात साजरा होणाऱ्या या सणाच्या कक्षा देशभर रुंदावल्या आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून साता समुद्रापार परदशात नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने स्थायिक झालेले भारतीय लोक तिथे भारतीय सण-उत्सव साजरे करुन आपली संस्कृती जपत आहेत.

नवी मुंबई मधील वाशी गावातील संजय भगत आणि निशा भगत दांपत्य मागील १५ वर्षांपासून ऑस्ट्रेलिया देशातील मेलबर्न शहरात वास्तव्यास आहेत. मागील सात वर्षांपासून भगत दांपत्य आपल्या घरी बाप्पाला विराजमान करत आले आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

डॉक्टरांकडून शिबिरार्थींना योग्य मार्गदर्शन