पनवेल महानगरपालिकेच्या खारघर प्रभागांमध्ये "माझी माती, माझा देश" उपक्रम अंतर्गत अमृत कलश यात्रा

भजनी मंडळ आणि ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात  मोठ्या दिमाखात, उत्साहात यात्रेचे आयोजन

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्यावतीने मा.आयुक्त  गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र शासनाच्या ‘माझी माती माझा देश’ अभियानांर्गत अमृत कलश यात्रेच्या वॉर्ड स्तरीय कार्यक्रमास आज सुरुवात झाली. यामध्ये आज खारघरमध्ये 6 वॉर्डांमध्ये  ही यात्रा आयोजित करण्यात आली .यामध्ये सुमारे 600 विद्यार्थ्यांनी  घरोघरी माती व तांदळाचे दाणे गोळा करून नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेतले. यावेळी भजनी मंडळ आणि ढोल ताशा अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात  मोठ्या दिमाखात, उत्साहात यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या यात्रेमध्ये  खारघर प्रभाग कार्यालयाचे  अधिकारी, कर्मचारी , सरस्वती कॉलेज आफॅ इंजिनिअरींग, भारती विद्यापीठ इंजिनिअरींग कॉलेज व ए. सी. पाटील कॉलेज ऑफ  इंजिनिअरींगचे NSS चे विद्यार्थी,क्षेत्र समन्वयक डॉ. सुनिता पाल,कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमोल पाटील उपस्थित होते. तसेच माजी नगरसेवक ,नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन कलश यात्रेमध्ये सहभागी झाले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपानिमित्ताने संपूर्ण राज्यात  व देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश अर्थात’ माझी माती माझा देश’ अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम घेण्यात आले. या अभियानांर्गत शेवटचा उपक्रम म्हणजे अमृत कलश यात्रा. दिल्लीमध्ये हुतात्मा स्मारकाजवळ देशाच्या वीरांच्या स्मरणार्थ उभारलेल्या अमृत वाटिकेत या कलशांमधील माती आणि तांदूळ पेरून या ठिकाणी ‘अमृत वाटिका’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन ‘अमृत कलश यात्रा’ काढण्यात येत असून ही ‘अमृत वाटिका’ ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे.

पनवेल महापालिकेच्यावतीने खारघर नंतर बुधवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी कळंबोली व खांदा कॉलनी, गुरूवारी दिनांक 21 सप्टेंबर रोजी कामोठे, शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी पनवेल येथे अमृत कलश यात्रा काढण्यात येणार आहे.  दिनांक 1 ऑक्टोबर रोजी संपुर्ण शहरातील माती एकत्रित करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी दिली आहे.

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने पनवेल कार्यक्षेत्रात "माझी माती, माझा देश" उपक्रम अंतर्गत अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी एक मूठ माती किंवा तांदळाचे दाणे या कलशामध्ये प्रदान करून  केंद्र शासनाच्या  या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे. - आयुक्त गणेश देशमुख ,पनवेल महानगरपालिका

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण तालुक्यात ८,४४४ बाप्पाची मोठ्या उत्साहात, भक्तिभावाने प्रतिष्ठापना