आशियातील सर्वात मोठ्या वलस्टर पुनर्विकास प्रकल्पाचे भूमीपुजन

भविष्यात ठाणे सह राज्यातील इतर शहरांचाही ‘क्लस्टर'द्वारे विकास -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : २२ नंबर सर्कल, किसननगर या भागातील यु.आर.सी. क्र.१-२ येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान (क्लस्टर) पुनर्विकास योजना मधील नवीन प्रकल्पाचे भूमीपुजन त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथील नेचर पार्क आणि इतर विविध विकास कामांचा ई-शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३० डिसेंबर रोजी संपन्न झाले.

याप्रसंगी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्यान'चे  संचालक मल्लिकार्जुन, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे आणि माजी नगरसेवक, नगरसेविका, आदि उपस्थित होते.
‘वलस्टर'साठी अनेक संघर्ष करावे लागले. साईराज बिल्डिंगची दुर्घटना अजुनही लक्षात असून या दुर्घटनेत १८ जणांंचा मृत्यू झाला होता. धोकादायक इमारती सर्वांनाच काळजी टाकणाऱ्या असतात. या पार्श्वभूमीवर आम्ही ठाणे येथे वलस्टर योजना राबविण्याचा संकल्प केला. काही इमारती अनधिकृत जरी असल्या तरी त्यातील माणसे, त्यांचा जीव महत्त्वाचा असून माणुसकीच्या भावनेतूनच क्लस्टर योजनेचा जन्म झाला. क्लस्टर योजनेत काही त्रुटी होत्या. पण, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या त्रुटी दूर करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

वलस्टर या योजनेमधील पुढील टप्प्यातील कामांकरिता वेगवेगळे भूखंड मिळत आहेत. ‘क्लस्टर पुनर्विकास योजना'च्या पहिल्या टप्प्यात साडेदहा हजार घरांचे काम पूर्णत्वास जाणार आहे. तर पुढील काम दोन टप्प्यातच पूर्ण करण्याचे मी संबंधितांना निर्देश दिले आहेत. ‘वलस्टर योजना'साठी पूर्वी काम केलेल्या कामगारांचे प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. जवळपास १५०० हेक्टर भूखंडावर होणारा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प भारतातीलच नव्हे; तर आशियातील पहिला इतका मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे. समाजासाठी जगणे, अशी धर्मवीर आनंद दिघे यांनी दिलेली शिकवण घेवून मी आता जगतोय. मुख्यमंत्रीपदाचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन बदलण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत, याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानतो. आनंदवन संकल्पना मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत ठाणे मध्ये पहिल्या टप्प्यात २७ किलोमीटर आणि ५०० मीटर रुंदीचा श्रीनगर ते गायमुख या भागात सदर प्रकल्प राबविला जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षारोपण, ग्रीन पॅच, ऑक्सिजन पार्क, अर्बन फॉरेस्ट असे उपक्रम राबविले जाणार आहेत. शासनाकडून राज्यात बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे.


‘क्लस्टर पुनर्विकास योजना'मध्ये लोकांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची घरे बांधून द्यावीत. नुसत्या इमारती उभ्या न करता नियोजित शहर निर्माण करायचे आहे. येथील लोकांना आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा मिळायला हव्यात, असे सूचित करताना धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजुंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मी कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्चासित केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविक करताना ‘क्लस्टर पुनर्विकास योजना'बद्दलची माहिती सांगितली. तसेच आनंदवन आणि क्लस्टर समूह विकास योजना याबाबतची चित्रफीत दाखविण्यात आली. शेवटी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

क्लस्टर विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा असून गरजुंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटीबध्द आहे. आनंदवन, क्लस्टर आणि डीप क्लीन ड्राईव्ह या अभियानाचा परिणाम निश्चितच येत्या काळात सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने दिसून येईल. भविष्यात ठाणे सह राज्यातील इतर शहरांचाही ‘क्लस्टर पुनर्विकास योजना'च्या माध्यमातून विकास केला जाईल. - ना. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री - महाराष्ट्र राज्य. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

बहुप्रतिक्षीत ‘मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक'चे उद्‌घाटन दृष्टीपथात