शहर स्वच्छतेवर अधिक बारकाईने निर्देश

महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांचा वेबसंवादद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद  

नवी मुंबई : राज्यातील कोणत्याही शहरापेक्षा नवी मुंबईमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहयोगातून महापालिकेने स्वच्छतेमध्ये आपली कामगिरी नेहमीच उंचावत नेलेली आहे. नवी मुंबईकडून राज्य आणि केंद्र सरकारलाही स्वच्छता-सुशोभिकरण कामात मोठ्या अपेक्षा असून त्यादृष्टीने स्वच्छता नियमित करण्याची गोष्ट असल्याने आपण स्वच्छता कार्यवाहीत अधिक प्रभावी काम करण्याची गरज असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.

शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दोन्ही अतिरिक्त आयुक्त, विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांना ऑनलाईन वेबसंवादद्वारे निर्देश दिले.

सध्याच्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्लास्टिक पिशव्या न वापरण्याविषयी अधिक प्रभावी जनजागृती करण्यासोबतच प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा तीव्रतेने राबविण्यात यावी. त्याचप्रमाणे सण-उत्सव काळात लागलेले अनधिकृत शुभेच्छा बॅनरही हटविण्याची आणि शहर विद्रुपीकरण रोखण्यासाठी ते लागू न देण्याची मोहीम तीव्र करावी. सण-उत्सव खरेदीच्या अनुषंगाने मार्केट एरिया नियमित स्वच्छ राहील याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे आयुवत नार्वेकर यांनी सूचित केले.

कचरा गाड्यांच्या वेळांबाबत पुन्हा खातरजमा करून घेण्याचे निर्देश देतानाच आयुक्त राजेश नार्वेकर यांनी कचरा गाड्यांच्या सुव्यवस्थेबाबत तसेच त्यामध्ये कचरा वर्गीकरण करून ठेवला आणि वाहून नेला जात असल्याबाबत तपासणी करीत रहावी, असे सांगितले. मोठ्या सोसायट्यांमधील कचरा विल्हेवाट प्रकल्प तसेच उद्यानांमधील कम्पोस्ट पीटस्‌ याकडेही बारकाईने लक्ष देतानाच प्रोसेसिंग प्लान्टकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

दरम्यान, नवी मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आकर्षक शिल्पाकृतींमुळे शहराला एक वेगळेच आकर्षक दृश्यस्वरुप आले असून या शिल्पाकृतींची स्थिती तपासून घ्यावी. तसेच आवश्यकतेनुसार त्यामध्ये तातडीने दुरुस्ती करावी आणि त्याचा परिसरही सुशोभित करावा, असेही निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी वेबसंवादामध्ये दिले आहेत.

नवी मुंबईचे तलाव देखील शहराची एक वेगळी ओळख असून तलावांचे जलाशय नियमित स्वच्छ राहतील याकडे लक्ष देणारी यंत्रणा ज्या भागांमध्ये शिथील झालेली आहे, त्यांना कृतीशील करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. त्यादृष्टीने तलाव स्वच्छ करण्यासाठी ठेवलेल्या तरापयांचा दिवसातून ३ ते ४ वेळा वापर करुन जलाशय स्वच्छ ठेवण्याकडे लक्ष देण्यात यावे. त्याचप्रमाणे नाल्यांवरील नेटस्‌ आणि नाल्यांमधील स्क्रिन्स आणि रस्त्यांच्या कडेला असलेल्या वॉटर एन्ट्रीज याकडेही विशेष लक्ष द्यावे, असे आयुवत नार्वेकर यांच्याकडून सूचित करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहराकडे केवळ येथील नागरिकच नव्हे तर शहराला विविध कारणांनी भेटी देणारे नागरिकही स्वच्छ-सुंदर शहर म्हणून बघतात. त्यामुळे या शहराचा नावलौकिक सतत राखण्याची आणि वाढविण्याची आपली जबाबदारी लक्षात घेऊन प्रत्येक घटकाने अधिक कृतीशील व्हावे. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ठाणे शहरात वाहतूक बदलाची एैसी तैसी