एपीएमसी बंद ठेवून माथाडी कामगारांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा

माथाडी कामगारांच्या ‘बंद'मुळे एपीएमसी मधील सर्व व्यवहार ठप्प

नवी मुंबई : माथाडी कामगारांचे आराध्य दैवत कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी ८० व्या शतकामध्ये चळवळ उभी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अण्णासाहेबांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. ती चळवळ आता पुन्हा सक्षमपणे उभी रहात असून, या चळवळीला तसेच मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणला तमाम माथाडी कामगारांचा भक्कम पाठींबा  आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशी विनंती ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी विशेषतः मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरु असलेल्या आमरण उपोषणाला तमाम माथाडी कामगारांनी ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'च्या आवारातील कामे २७ ऑवटोबर रोजी दिवसभर बंद ठेऊन पाठिंबा व्यक्त केला. यावेळी एपीएमसी मधील माथाडी भवन येथे सभा आयोजित केली होती, या सभेत नरेंद्र पाटील आणि आ. शशिकांत शिंदे बोलत होते.

सभेमध्ये ‘महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन'चे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, कार्यकर्ते अजय इंगुळकर, जितेंद्र येवले, दिनकर सनुगले, बबन संकपाळ, नाना धोंडे, संभाजी बर्गे, सुरज बर्गे यांचीही भाषणे झाली. सदर सभेचे सूत्रसंचालन ‘युनियन'चे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी केले.

‘एपीएमसी'च्या पाचही मार्केट आवारातील कामे बंद ठेऊन कामगार, पालावाला महिला, मेहता कर्मचारी, वारणार, मापाडी कामगार सभेला उपस्थित होते. या सभेला ‘युनियन'चे संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, ॲड. भारती पाटील, डॉ. राजश्री पाटील, आदि उपस्थित होते.

दरम्यान, माथाडी कामगारांच्या या ‘बंद'मुळे एपीएमसी मार्वेÀट मधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे स्टोअर समोरील वाहतूक कोंडी फुटण्यास अजून १५ महिन्यांची प्रतीक्षा