वेगवान विकासासाठी जबाबदार नागरिक भावना महत्वाची -आयुवत जाखड

कल्याण : मी एक जबाबदार नागरिक, अशी भावना सगळ्यांच्या मनात आली तर विकासाचा वेग वाढेल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी कल्याण येथे केले.

‘माय युवा भारत' या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका आणि प्रेस क्लब-कल्याण यांच्या संयुक्त विद्यामाने कल्याण मधील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महापालिका कामकाज आणि महापालिकेचा अर्थसंकल्प या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमवेत आयोजित चर्चासत्रामध्येे आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांनी संवाद साधला.

याप्रसंगी महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक लक्ष्मण पाटील, मुख्य लेखा अधिकारी दिग्विजय चव्हाण, उपायुक्त अर्चना दिवे, धैर्यशील जाधव, अतुल पाटील, माहिती-जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत तसेच इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

समाजाप्रती आपले योगदान काय असेल समजून घेतले पाहिजे. बजेट विषयी माहिती आजच्या तरुण पिढीला समजावी, या मुलांचे विचार समजून घ्यावेत या दृष्टीकोनातून चर्चासत्राचे आयोजन केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यावेळी दिली.

यासमयी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आयुक्त जाखड आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण विभागाचे उपायुक्त धैर्यशील जाधव यांनी स्थानिक स्वराज्य संस्था, नियमावली, संस्थेची कर्तव्य याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. तर मुख्य लेखा वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण यांनी महापालिकेचे अंदाजपत्रक कसे तयार होते, त्यात काय तरतुदी असतात याचे विश्लेषण विद्यार्थ्यांसमोर सादर केले.

माय युवा भारत असे शासनाचे डिजीटल व्यासपीठ असून सर्व युवा वर्गाला एकमेकांना जोडण्यासाठी तुमच्या देण्यासाठी केंद्र शासनाने सदर व्यासपीठ तयार केले आहे. युवा वर्गाने स्ब्ंप्ीीीू.ुदन्.ग्ह रजिस्ट्रेशन करुन मेरा युवा भारत या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन या उपक्रमाचे नोडल ऑफिसर प्रशांत भागवत यांनी यावेळी केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव आणि उद्यान अधीक्षक महेश देशपांडे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरणच्या रस्त्यावर धुळीचे कण; रस्ते साफ करण्याची मागणी