पनवेलमध्ये ‘शक्तीवंदन' कार्यशाळा उत्साहात संपन्न

पनवेल : महिला शक्तीला सक्षम करण्याबरोबरच तिचा आदर कायम राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध उपक्रमे राबविले जातात,. त्याच अनुषंगाने पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्या दृष्टिकोनातून ‘भाजपा महिला मोर्चा'च्या वतीने पनवेल मध्ये ‘शक्तिवंदन' कोकण विभागीय कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेला प्रमुख मान्यवर म्हणून ‘भाजपा'चे मावळ लोकसभा मतदार संघ निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, प्रमुख वक्त्या म्हणून ‘मन की बात'च्या प्रदेश संयोजिका मृणाल पेंडसे, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील यांच्यासह महिला प्रदेश पदाधिकारी तसेच विविध जिल्ह्यांच्या अध्यक्षा उपस्थित होत्या.

व्यापक दृष्टी असलेल्या नारी शक्ती वंदन अधिनियम कायद्यामुळे देशातील लोकशाही आणखी सक्षम करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या वर्षात देशातील दोन कोटी महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचे जे स्वप्न पंतप्रधान मोदींनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी महिला बचत गट संस्थांना समृध्द करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याचबरोबर महिलांसाठी विविध योजना अंमलात आणून त्यांचे सशक्तीकरण केले जात असतानाच देशातील महिलांना सर्वात मोठे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून होत आहे. त्या अनुषंगाने या कार्यशाळेत मृणाल पेंडसे यांनी प्रमुख वक्त्या म्हणून महिलांना मार्गदर्शन केले.

आकुर्ली येथे काकाजीनी वाडी येथे संपन्न झालेल्या या कार्यशाळेला ‘महिला मोर्चा'च्या प्रदेश सरचिटणीस डॉ. मंजुषा कुद्रीमुद्री, उपाध्यक्षा प्रज्ञा धवन, सचिव शिल्पा मराठे, यशोधरा गोडबोले, मृणाल खेडकर, अपर्णा पाटील, तृप्ती मामले, उत्तर रायगड जिल्हाध्यक्षा अश्विनी पाटील, सरचिटणीस सुजाता साळवी, दक्षिण जिल्हाध्यक्षा हेमा मानकर, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सुरेखा खेराडे, दक्षिण जिल्हाध्यक्षा सुजाता दळवी, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षा कोडगावकर, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, तालुकाध्यक्षा नीता चोणकर यांच्यासह बांदा ते पनवेल विभागातील प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी नगरसेविका रुचिता लोंढे तर आभार प्रदर्शन संध्या शारबिद्रे यांनी केले.

शक्ती वंदन महिला शक्तीला वंदन आणि सबल करणारा कार्यक्रम आहे. महिलांच्या नेतृत्वाखाली समाज विकसित झाला पाहिजे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत. विविध योजनांची अंमलबजावणी करत असताना महिलांप्रती आदरभावना वृध्दींगत करण्याचे प्रामाणिक काम होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातील महिला असून त्या आपल्या देशासाठी भूषणावह आहेत. त्या अनुषंगाने संपूर्ण देश आदिवासी समाज आणि महिला वर्गाकडे आदराने पाहत आहे. येणाऱ्या काळात २ कोटी महिलांना लखपती बनविण्याचे उद्दिष्ट्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले असून बचत गट आणि संस्था अधिक शक्तिशाली बनणार आहेत. सदर कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन महिलांनी उत्तमपणे केले आहे. - आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सर्वंकष स्वच्छता मोहिमेला माजिवडा-मानपाडा विभागात उत्स्फुर्त प्रतिसाद