खैरणे बोनकोडे मधील ‘वाहतुक कोंडी'ची समस्या लवकरच मार्गी

वाशी : खैरणे बोनकोडे भागातील वाहतुक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महापालिका द्वारे कोपरी नाल्यावर रेल्वे रुळालगत आणखी एका पुलाची निर्मिती करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे खैरणे बोनकोडे भागातील वाहतुक कोंडी लवकरच फुटणार आहे.

कोपरखैरणे भागात झपाट्याने नागरीकरण वाढल्याने वाहनांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्यामुळे कोपरखैरणे भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. याठिकाणी १९९९ -२००० साली महापालिका तर्फे कोपरी नाल्यावर पामबीच मार्गाला जोडण्यासाठी पुलाची निर्मीती करण्यात आली आहे. मात्र, सदर रस्ता सोयीचा असल्याने या मार्गावर आता सर्वाधिक वाहतुक कोंडी होत असते. या ठिकाणी वाशी आणि ठाणे कडे ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते.त्यामुळे इथे रोज वाहतुक कोंडी होत असल्याने सदर वाहतुक कोंडी फोडण्यासाठी नवी मुंबई महापालिका तर्फे कोपरी नाल्यावर खैरणे गाव ते कोपरी तलाव या मार्गावर रेल्वे रुळालगत आणखी एका पुलाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सदर पुल तयार झाल्यानंतर खैरणे येथून थेट एपीएमसी मार्केट दरम्यान प्रवास करता येणार आहे. या कामाला आता प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली असून, येत्या पावसाळ्यापूर्वी सदर पुल उभारणीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती महापालिका अभियंत्यांनी दिली. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

'उपवन तलावाचे सौंदर्य आणखी उजळले!'