जागतिक जल दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून जलदिंडी

डोंबिवली : टिळकनगर विद्यामंदिर, डोंबिवली, पर्यावरण दक्षता मंडळ, डोंबिवली, श्री लक्ष्मी नारायण संस्था, ऊर्जा फौंडेशन आणि विवेकानंद सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक जल दिनाच्या निमित्ताने २२ मार्च रोजी जलदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.या वर्षीची जलदिनाची मध्यवर्ती संकल्पना ‘शांततेसाठी पाणी' ही असून या पृथ्वीवरील सर्व प्राणिमात्रांचा पाण्यावर समान हक्क आहे. बचत पाण्याची, गरज काळाची; पाणी अडवा, पाणी जिरवा; स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर इत्यादि घोषवाक्यांनी टिळकनगर परिसर दुमदुमून गेला. ‘पाण्याचे संवर्धन, संरक्षण तसेच नैसर्गिक जलस्त्रोताचे रक्षण करण्यासाठी आपण सर्व देखील कटिबद्ध राहुया' अशी जलप्रतीक्षा टिळकनगर विद्यामंदिर मधील विद्यार्थ्यांनी घेतली.

  श्री लक्ष्मी नारायण संस्थेच्या सुरेखा जोशी, पर्यावरण दक्षता मंडळाचे मेधा वैद्य, उज्वला केतकर, आदित्य कदम, समीक्षा चव्हाण, रूपाली शाईवाले, ऊर्जा फौंडेशनच्या स्नेहल दीक्षित, मेधा गोखले, प्रिया राणे, गीता शेट्टीगर तसेच विवेकानंद सेवा मंडळचे सचिव अनिल मोकल आणि सारिका परब आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या उपक्रमासाठी टिळकनगर विद्यामंदिरचे पर्यवेक्षक चौधरी  आणि राष्ट्रीय छात्र सेनेच्या विदुला साठे यांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य लाभले. जलदिंडीमध्ये परंपरागत पद्धतीने पालखी, अब्दागिरी, झांज पथक, झेंडे पथक तसेच पारंपरिक वेशातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि पर्यावरणाविषयी संवेदनशील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. पाणी बचतीचे महत्व विषद करणारे फलक अनेकांच्या हातात झळकत होते. टिळकनगर विद्यामंदिरच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे  विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच या  सर्व संबंधित संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

स्वीप कार्यक्रमांर्गत शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती