‘मुंबई अश्वमेध महायज्ञ'चा शुभारंभ

नवी मुंबई : आपले पर्यावरण सर्व अशुध्दतेपासून मुक्त करण्यासाठी ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ' महत्वाचे आहे. पर्यावरण आणि सामाजिक जडणघडणीला धोका निर्माण करणारी अनेक आव्हाने आणि वाईट गोष्टींचा सामना करण्यासाठी, तसेच समतोल, सदभाव आणि पवित्रता पुनर्संचयित करण्यासाठी सदर यज्ञ एक शक्तिशाली साधन आहे. ‘अश्वमेध यज्ञ' केवळ धार्मिक विधी नसून, याचा सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा प्रभाव आहे, असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी खारघर येथे केले.

‘अखिल जागतिक गायत्री परिवार'च्या वतीने खारघर मधील कॉर्पोरेट पार्क येथे पाच दिवसीय ‘मुंबई अश्वमेध महायज्ञ'चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘अश्वमेध महायज्ञ'चा शुभारंभ राज्यपाल बैस यांच्या हस्ते २२ फेब्रुवारी रोजी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी वन, सांस्कृतिक -मत्स्यविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार, ‘अखिल विश्व गायत्री परिवार'चे अध्यक्ष श्रध्देय शेलबाला पण्डया, ‘गायत्री विद्यपीठ'चे अध्यक्ष, शेफाली पण्डया, ‘देव संस्कृती विश्व विद्यालय'चे जनसंपर्क अधिकारी कुलगुरु डॉ. चिन्मय पण्डया, आदि मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर विशाल महायज्ञात सहभागी झालेले सर्व लोक भाग्यवान आहेत. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावण झालेली भूमी महाराष्ट्रात आहे. ती भूमी परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाची आहे. ती भूमी  त्र्यंबकेश्वराची आहे. महाराष्ट्र संतांची आणि शूरवीरांची भूमी आहे. या भूमीला संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्या शिकवणुकीचे वरदान लाभले असून, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, गुरु गोविंदसिंग महाराज अशा थोर संतांची आणि वीरांचीही ही भूमी आहे, असे राज्यपाल रमेश बैस म्हणाले. अशा पवित्र भूमीवर ‘अश्वमेध महायज्ञ' आयोजित केला जात आहे, हीच मोठ्या भाग्याची गोष्ट असल्याचे मत राज्यपाल बैस यांनी व्यक्त केले.
रामायणाच्या युगात देखील ‘अश्वमेध यज्ञ' करण्यात आला होता. ‘अश्वमेध यज्ञ'चा उद्देश राज्याचे वर्चस्व आणि एकता प्रस्थापित करणे होता.  यज्ञ करून त्यांनी आपल्या प्रजेची समृध्दी, सुरक्षा आणि कल्याणासाठी सुनिश्चित केले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर सातत्याने पुढे जात आहे. ‘अश्वमेध महायज्ञ'च्या माध्यमातून आपल्याला आपले अंतःकरण आणि मन मत्सर, द्वेष आणि अज्ञानापासून मुक्त करायचे आहे. तसेच राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना प्राचीन अश्वमेध यज्ञातील मूल्ये अंगीकारण्याचे आवाहनही राज्यपाल बैस यांनी यावेळी केले.

‘अखिल जागतिक गायत्री परिवार'ने सप्तसूत्र चळवळ अंतर्गत ‘व्यसनमुक्ती अभियान'चे आयोजन केले असून सदर चळवळ ‘गायत्री परिवार'च्या सृजन सदस्यांनी देशभर चालवली आहे. आज समाजात व्यसनाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, लहान मुले मोठ्या संख्येने त्याचे बळी ठरत आहेत. ‘अभियान'च्या माध्यमातून करोडो लोकांना व्यसनमुक्तीचा संदेश दिला जात आहे. सदर काम प्रशंसनीय असून ते प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात घेऊन जायचे आहे. त्यामुळे सर्व राज्याच्या विद्यापीठांच्या कुलगुरुंना आपला परिसर अंमली पदार्थांपासून मुक्त ठेवण्याबाबत जागरुक राहण्याच्या सूचना यावेळी राज्यपाल रमेश बैस यांनी दिल्या.

वि्ीलाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत ‘अश्वमेध महायज्ञ' होत आहे, याचा मला अभिमान आहे. मुंबईतील पाच दिवसीय ‘अश्वमेध महायज्ञ'चा शुभारंभ झाला आहे.  या ‘अश्वमेध महायज्ञ'मुळे फक्त वायू मंडलातील प्रदूषण  मुक्त होणार नाही तर आपल्या अंतरमनातील प्रदूषणाचेही शुध्दीकरण होईल. यंदाचे वर्ष सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक आणि अविस्मरणीय आहे. या वर्षाच्या प्रारंभी अयोध्या येथे प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. राम मंदिराचा प्रत्येक दरवाजा महाराष्ट्रातील सागवनापासून तयार केला गेला आहे. ‘राष्ट्र'ला महासत्ता बनविण्यासाठी ‘महाराष्ट्र'पासून सुरुवात होणे आवश्यक आहे. त्यामुळेच ‘गायत्री परिवार'ने ‘महायज्ञ'साठी ‘महाराष्ट्र'ची निवड केली आहे, असे मत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केले.

आपल्या प्रास्ताविकातून ‘देव संस्कृती विश्व विद्यालय'चे जनसंपर्क अधिकारी कुलगुरु डॉ. चिन्मय पण्डया यांनी ‘अश्वमेध महायज्ञ'चा इतिहास विषद केला. तसेच या पाच दिवसीय ‘अश्वमेध महायज्ञ'बद्दल माहिती दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शाडुच्या गणेशमूर्तींसाठी महापालिकेचा आग्रह