डीपीएस तळ्याशेजारी ४ पलेमिंगोंचा मृत्यू, २ जखमी

नवी मुंबईः ‘जागतिक पाणथळ क्षेत्र दिन'च्या आदल्या दिवशी नेरुळ जेट्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महाकाय साइनबोर्ड कमानीसोबत टक्कर झाल्यामुळे ४ पलेमिंगो मृत्यूमुखी पडण्याची तसेच २ जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मॉर्निंग वॉक, जॉगिंग करणाऱ्या लोकांनी १ फेब्रुवारी रोजी पहाटे साइन बोर्डासोबत पक्ष्यांची टक्कर होण्याचा आवाज ऐकला आणि काहींनी आपल्या डोळ्यांनी त्यांना खाली आदळताना देखील पाहिले.

मी ४ मृत पलेमिंगो, तर २ जखमी झालेले पलोमिंगो पाहिले, असे दररोज जॉगिंगला येणारे नेरुळ मधील मनिष पिटकर या पर्यावरणवाद्याने सांगितले त्यांना दुजोरा देत नेहमी चालायला येणाऱ्या प्रितिका भारद्वाज देखील हेच म्हणाल्या. त्यांनी अग्निशामक दल आणि इतर हेल्पलाइन्सना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सर्पमित्र संपत माने घटनास्थळी आल्यावर त्यांनी रस्ता चुकलेल्या जखमी पलेमिंगोंना शांत करण्याचा प्रयत्न केला. ते २ पक्षी नंतर उडून गेले, असे त्यांनी सांगितले.

मी १९२६ दूरध्वनी क्रमांकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण, तो सेवेसाठी उपलब्ध नव्हता, अशी खंत प्रितिका यांनी व्यवत केली. दरम्यान, यानंतर सदर ४ लहानग्या पक्षांना खाडीच्या पाण्यात प्रवाहित करुन अश्रूपूर्ण निरोप देण्यात आला.

पर्यावरणवाद्यांनी सदर मयाकाय साइन बोर्ड तात्काळ काढून टाकण्याची मागणी केली आहे. जल परिवहन प्रकल्प अपयशी ठरल्यामुळे जेट्टीचा उपयोग होत नसल्याची बाब ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी संबंधितांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

अशा प्रकारची घटना घडल्यास या प्रकरणात शवविच्छेदन होणे आवश्यक आहे. पक्षी स्थानिक नसून स्थलांतरीत आहेत. त्याचप्रमाणे ते संरक्षित श्रेणीत मोडतात. सिडको पामबीच रोडवर कमान उभारु शकते आणि डीपीएस रोडच्या टोकाशी लहान चिन्ह लावू शकते. आसपासच्या परिसरात असलेल्या पलड लाईटमुळे प्रकाश प्रदुषण होते, ज्याचा पक्ष्यांना अतिशय त्रास होतो, असे बी. एन. कुमार यांनी सांगितले.

ठाणे खाडी परिसरातील पलेमिंगो पक्षी अभयारण्यात (टीसीएफएस) भरतीची पातळी १५ सेमीच्या पलिकडे गेल्यावर हजारो पलेमिंगो नवी मुंबईमधील पाणथळ क्षेत्रांकडे धाव घेतात. राज्य कांदळवन फाऊंडेशन आणि बीएनएचएस यांनी टीसीएफएससाठी सॅटेलाईट पाणथळ क्षेत्र व्यवस्थापन आराखडा विकसीत केला आहे. बेलपाडा, भेंडखळ, पाणजे, एनआरआय-टीएस चाणक्य तसे भांडूप पंपिंग स्टेशन येथील पाणथळ क्षेत्रांचे देखील संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सदर आरखड्यात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, सदर दुर्दैवी घटनेमुळे स्थलांतरीत पक्षी आणि त्यांना अधिवासांचे संरक्षण करण्याच्या महत्वावर तीव्र प्रकाशझोत पडला आहे. ‘सिडको'ने डीपीएस तळे सुध्दा बुजण्याआधी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याची तसेच जैवविविधतेचे संरक्षण करण्याची विनंती बी. एन. कुमार यांनी केली आहे.

सर्वप्रथम मीच नवी मुंबईला पलेमिंगो सिटीचा दर्जाची मागणी केली होती. नवी मुंबई महापालिकेने डीपीएस तळे ताब्यात घेऊन त्याला पर्यटक क्षेत्र बनविण्याबद्दल पर्यावरणाच्या चाहत्यांनी देखील आवाज उठवणे आवश्यक आहे. खरेतर तत्कालीन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘बीएनएचएस'च्या सहयोगाने तळ्याची देखभाल करण्याच्या विषयात त्यांना रुची असल्याचे ‘सिडको'ला पत्राद्वारे सूचित केले होते. परंतु, ‘सिडको'ने या कल्पनेला लाल कंदील दाखवला आहे. -बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सार्वजनिक स्वच्छतेमध्ये बाधा आणणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा