वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना
जिल्ह्यात ५,४७,८७० अर्जांच्या नोंदी, १००ज्ञ्र् अर्जांची तपासणी पूर्ण
ठाणे : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून सदर योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणतीही प्रशासकीय क्लिष्टता न आणता सुलभता आणावी, अशा प्रकारच्या सूचना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्याला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त भगिनींचा या योजनेमध्ये सहभाग नोंदवून ठाणे जिल्हा राज्यात अव्वल राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्हा प्रशासनाला केले होते. जिल्हाधिकारी शिनगारे यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी अत्यंत कठोर परिश्रम घेत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेची यशस्वी अंमलबजावणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत ६ ऑगस्ट २०२४ पर्यंत जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार ८७० अर्जांच्या नोंदी झाल्या असून १०० टक्के अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या ४ लाख ७६ हजार २५८ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
गेले काही दिवस ठाणे जिल्हा प्रशासनातील महिला-बालविकास विभागासह अन्य विविध विभाग, सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती मधील अधिकारी-कर्मचारी एकवटून सदर योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांवर अक्षरशः दिवसरात्र कार्यवाही करीत होते.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हाधिकारी शिनगारे यांनी जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा महिला-बालविकास अधिकारी, सर्व महसूल यंत्रणांच्या वेळोवेळी बैठका घेवून योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने होत असलेल्या कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतला होता. त्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, सर्व महापालिका आयुक्त, जिल्हा महिला-बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, प्रकल्प अधिकारी तसेच महिला बचतगट, एकात्मिक बालविकास अधिकारी, प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका त्याचबरोबर इतर विभागांच्याही अधिकारी-कर्मचारी वर्गाची मोलाची साथ लाभली. एकंदरीतच सदर योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
ठाणे जिल्ह्याची कामगिरी कौतुकास्पद...
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत ६ ऑगस्ट पर्यंत ठाणे जिल्ह्यात ५ लाख ४७ हजार ८७० अर्जांच्या नोंदी झाल्या असून १०० टवव्ोÀ अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. यापैकी मान्यताप्राप्त अर्जांची संख्या ४ लाख ७६ हजार २५८ इतकी असून ७०,०४५ अर्ज त्रुटीयुक्त आहेत. तर ८७५ अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलांपर्यंत योजनेची माहिती पोहोचविणे, त्यांची नोंदणी करुन घेणे आणि आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन घेणे, यासाठी सर्वच विभागांनी व्यवस्था केली होती. या योजनेसाठी लागणारे दाखले नागरिकांना मिळण्यासाठी तहसिलदारांनी योग्य त्या सुविधा निर्माण केल्या होत्या. प्रभाग अधिकारी, कर संकलन अधिकारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदिंनी एकत्रित कामे केली. शहरी भागात प्रत्येक प्रभाग कार्यालयात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. या योजनेतील सहभागासाठी कोणत्याही भगिनीला अडचण येणार नाही, याची कटाक्षाने दक्षता घेण्यात आली होती.
ठाणे जिल्ह्यात शहरी भागाबरोबरच आदिवासी, ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात आहे. आदिवासी भागातील महिलांपर्यंत सदर योजना पोहोचवून त्यांना याचा लाभ मिळावा, यासाठी सर्वच विभागांनी काटेकोर नियोजन केले होते. पुढील महिन्याभरात आणखी काही महिला वंचित राहिल्या आहेत का? याची तपासणी करून उर्वरित महिलांची देखील नोंदणी करण्यात येईल.
-अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी-ठाणे.