वाशीमधील ‘महाराष्ट्र भवन’ कामाची आ. मंदाताई म्हात्रे यांनी केली पाहणी
विद्यार्थी बनले शेतकरी
डोंबिवलीः पुस्तकी ज्ञानाबरोबर शिकविलेल्या अभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव मिळणे आवश्यक आहेत. डोंबिवलीतील लोकमान्य गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांना शेती कशी करतात याचे शिक्षण देत असताना प्रत्यक्ष शेती करण्याचा अनुभव करून दिली. दावड़ी येथील भातशेती आणि भात लागवड कशी होते, ते विद्यार्थ्यांनी अनुभवले. एवढेच नव्हे तर शेतामध्ये विद्यार्थिनींनी नांगरही धरला होता.
विद्यार्थ्यांना शेती म्हणजे काय? शेतात शेतकऱ्यांना किती काम करावे लागते? शेतकरी किती मेहनत घेतात? ऊन, वारा, पाऊस यामध्ये सुद्धा शेतकरी कसे कष्ट करतात? याचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना यावा म्हणून त्यांना भाताच्या शेतीमध्ये भाताची लागवड करण्यासाठी नेले जाते. याही वर्षी विद्यार्थ्यांना दावडी येथे भातशेती दाखवण्यासाठी आणि भात लागवड करण्यासाठी नेण्यात आले होते. भात शेतीत चिखल किती असावा लागतो? भातशेतीला पाणी किती लागते? विद्यार्थ्यांनी भाताची लागवड करुन चिखलाने हात-पाय, कपडे खराब होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.एवढेच नव्हे तर शेतामध्ये विद्यार्थिनींनी नांगरही धरला होता.
भाताची शेती लोकमान्य गुरुकुलाचे शिक्षक मंगेश गायकर यांची आहे. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे वर्गशिक्षक राजश्री बडवे, सायली फणसे, व्यंकटेश प्रभुदेसाई, सारिका लोखंडे, भरत साळवी, विजय दिक्षीत, मंगेश गायकर आदि शिक्षकांनी भात लागवडीचा प्रत्यक्ष अनुभव शेतात काम करुन घेतला. मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांनी शिक्षकांचे कौतुक करत शेती करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शाबासकी दिली.