‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला नवी मुंबईत उदंड प्रतिसाद

नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा' उपक्रमाला नवी मुंबई महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. २७ डिसेंबर रोजी दिघा पासून सुरु झालेली ‘संकल्प यात्रा' १८ जानेवारी पर्यंत ४५ ठिकाणी केंद्र सरकार, राज्य शासन आणि नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करीत आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार यात्रेचे अत्यंत सुयोग्य नियोजन करण्यात आलेले आहे.

 या उपक्रमामध्ये केंद्र आणि राज्य शासन तसेच नवी मुंबई महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देणारे आणि योजनांचा लाभ मिळण्यासाठी अर्ज भरण्यापासून संपूर्ण सहकार्य करणारे विविध स्टॉल्स प्रदर्शित करण्यात आले आहेत. यामध्ये पीएम स्वनिधी योजना, स्वनिधी से समृध्दी योजना, आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड योजना, पीएम उज्ज्वला योजना, पीएम विश्वकर्मा योजना, पीएम मुद्रा लोन, स्वच्छ भारत अभियान, स्टार्ट अप इंडिया, स्टँड अप इंडिया, खेलो इंडिया, पीएमई बस सेवा, आरोग्य तपासणी अशा विविध योजनांच्या स्टॉलचा समावेश आहे.

‘विकसित भारत संकल्प यात्रा'मध्ये केंद्र सरकारच्या वतीने योजनांच्या माहिती प्रसारणासाठी एलईडी व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असून त्यावर पंतप्रधान मोदी यांचा संदेश प्रसारित केला जात आहे. तसेच विविध योजनांच्या स्टॉल्सवरुन नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे.

 ५ जानेवारी रोजी तुर्भे विभागात सकाळच्या सत्रात जनता मार्केट ब्रीजलगत ४१४ नागरिकांनी यात्रा उपक्रमात सहभागी होऊन योजनांची माहिती आणि लाभ घेतला. याप्रसंगी माजी नगरसेविका शुभांगी पाटील, शशिकला पाटील, उपायुक्त डॉ.राहुल गेठे, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. तसेच या दिवशी दुपारच्या सत्रात सानपाडा, सेवटर-७ मधील सिताराम मास्टर उद्यान येथे ७२८ नागरिकांनी यात्रा उपक्रमात सहभागी होऊन योजनांची माहिती आणि लाभ घ्ोतला. याप्रसंगी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, माजी नगरसेविका संगिता बोराडे, उपायुक्त डॉ.राहुल गेठे, सोमनाथ पोटरे, विभाग अधिकारी भरत धांडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

६ जानेवारी रोजी फायझर रोड जवळील मोकळ्या जागेत तुर्भे नाका येथे सकाळच्या सत्रात ५४२ नागरिकांनी तर तुर्भेगाव तलावाजवळ येथे दुपारच्या सत्रात ६३० नागरिकांनी उपक्रमात सहभाग घ्ोतला. याप्रसंगी माजी नगरसेवक रामचंद्र घरत, शुभांगी पाटील, शशिकला पाटील, सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी भरत धांडे, वैद्यकिय अधिकारी डॉ. मैथिली शिंदे, डॉ.गजानन मिटके आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

७ जानेवारीला सकाळच्या सत्रात माथाडी चौक एपीएमसी मार्केट येथे ६८७ नागरिक यात्रा उपक्रमात सहभागी झाले.  या दिवशी दुपारच्या सत्रात वाशी, सेक्टर-९ मार्केट येथे ३७९ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. याप्रसंगी माजी आमदार संदीप नाईक, माजी नगरसेविका माधुरी सुतार, वाशी विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे, वैद्यकिय अधिकारी डॉ.मोनिका पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

८ जानेवारीला सकाळच्या सत्रात वाशी रेल्वे स्टेशन येथे ९०४ नागरिक तर दुपारच्या सत्रात वाशी, सेवटर-२८ मधील डायमंड हॉटेल येथे ३५१ नागरिकांनी या उपक्रमात सहभाग घेतला.

दररोज सकाळ आणि दुपार या दोन सत्रांमध्ये विविध ठिकाणी ‘विकसित भारत संकल्प यात्रा' उपक्रम आयोजित करण्यात येत असून प्रत्येक ठिकाणावर त्या भागातील नागरिकांचा भरभरुन प्रतिसाद लाभताना दिसत आहे. याअंतर्गत १० जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत वाशी गांव येथे तसेच दुपारी २ ते ५ या वेळेत मनिषा विद्यालय वाशी येथे त्याचप्रमाणे ११ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ या वेळेत इनऑर्बिट मॉल, वाशी येथे आणि दुपारी २ ते ५ या वेळेत दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण-सेवा सुविधा केंद्र, वाशी येथे यात्रा उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्थळांची नोंद घेऊन त्या परिसरातील जागरुक नागरिक यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या तसेच महापालिकेच्या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच त्याचा लाभ घेण्यासाठी यात्रा स्थळांवर आवर्जुन उपस्थित रहावे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच