मुंबई सिनेट निवडणूक गोंधळ

‘मनविसेे'तर्फे विद्यापीठ कुलगुरुंसमोर ठिय्या

नवी मुंबई : सिनेट निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होत ‘मुंबई विद्यापीठ'चे कुलगुरु रवींद्र कुलकर्णी यांना जाब विचारला. याप्रसंगी ‘मनसेे'च्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत कुलगुरुंना विदुषकाची प्रतिमा भेट दिली.

तसेच कुलगुरु राजीनामा द्या, राजीनामा द्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, झाल्याचं पाहिजेत अशा आशयाच्या घोषणा देत ‘मनविसेे'च्या शिष्टमंडळाने खाली जमिनीवर बसून ठिय्या केले. याप्रसंगी ‘मनसेे'चे सरचिटणीस गजानन काळे, अखिल चित्रे, प्रमुख संघटक यश सरदेसाई, चेतन पेडणेकर, सुधाकर तांबोळी, संतोष गांगुर्डे उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

दिवाळे येथे श्री साई कला सर्कल ब्रास बँड प्रशिक्षण केंद्र, गजेबो गार्डनचे लोकार्पण