जुईनगर येथे मनसे चोर दहीहंडी साजरी

नवी मुंबईतील ५० गोविंदा पथकांनी रचले मानवी मनोरे

नवी मुंबई :  महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेरुळ-जुईनगर विभाग तर्फे ‘मनसे'चे नवी मुंबई सचिव अभिजीत देसाई यांनी सालाबाद प्रमाणे याही वर्षी मनसे चोरहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर दहीहंडी दरम्यान संपूर्ण नवी मुंबईतून सुमारे ५० गोविंदा पथकांनी तसेच बालगोपाळांनी मोठ्या संख्येत हजेरी दाखवत मानवी मनोरे रचण्यासाठी आपले प्रयत्न पणाला लावले. या बालगोपाळांना त्याचे मनोधैर्य वाढविण्यासाठी दहीहंडी स्थळी ‘मनसे'चे प्रदेश प्रवक्ते गजानन काळे यांची प्रमुख उपस्थित्ती होती. तसेच नेरुळ-जुईनगर विभागातील संपूर्ण नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. अभिजित देसाई यांनी पुढील वर्षी मोठ्या जोमाने सदरचा दहीहंडी उत्सव साजरा करुया असा शब्द देत कार्यक्रमाच्या सांगता समारंभात केली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

शिक्षक दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पोस्ट कार्ड पाठविले