सानपाडा येथे ‘नवीन मतदार नोंदणी अभियान'चे आयोजन

आपल्या देशाची लोकशाही जगात भवकम - आ.मंदाताई म्हात्रे

नवी मुंबई : आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या वतीने १५१-बेलापूर विधानसभा क्षेत्र अंतर्गत सानपाडा प्रभाग क्र.३० विभागातील नवीन मतदार नोंदणी अभियान १८ ऑगस्ट रोजी केमिस्ट भवन येथे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत आयोजक पांडुरंग आमले, ‘ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र'चे अध्यक्ष मारुती कदम, सुभाष बारवाल, वि्ील गव्हाणे, आनंद गावडे, नाना शिंदे, श्रीपाद पत्की, कुलवडे, देवेंद्र कोराले, विश्वास कणसे, ज्ञानेश्वर डोके तसेच इतर पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

भारतात निवडणुकांचा बिगुल कधी पण वाजू शकतो. त्याअनुषंगाने ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे अशा तरुण-तरुणींनी आपला मतदानाचा हक्क बजवावा म्हणून समाजसेवक पांडुरंग आमले यांच्या वतीने सानपाडा येथील प्रभागक्र.३० अंतर्गत ‘नवीन मतदार नोंदणी अभियान'चे आयोजन करण्यात आले होते. या ‘अभियान'मध्ये मोठ्या संख्येने तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तसेच ज्या नागरिकांना मतदानाचा अधिकार असून सुध्दा त्यांच्याकडे मतदान कार्ड नाही, असे नागरिक मतदानापासून वंचित राहू नये याकरिता त्यांचीही नाव नोंदणी केली जाणार आहे. याशिवाय मतदानाच्या कार्डामध्ये काही त्रुटी असतील त्याही सोडविण्याचे काम या ‘अभियान'द्वारे करण्यात आल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

कुठल्याही नागरिकाचा मतदानाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपल्या देशाची लोकशाही संपूर्ण जगात भक्कम आणि यशस्वी असल्याचे ‘भारत निवडणूक आयोग'ने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे. देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी मतदान करणे आवश्यक आहे. मतदार राजा आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी मतदारांनी निवडणुकीत मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. अभियान अंतर्गत मोठ्या संख्येने तरुण-तरुणी तसेच ज्येष्ठ नागरिक यांनी उपस्थित राहून नवीन मतदार नोंदणी करुन घेतली, असेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

सारसोळे येथे फुलपाखरु उद्यान बनविण्याची मागणी