एक सही संतापाची !

जुईनगर येथे स्वाक्षरीतून नागरिकांची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर नाराजी

नवी मुंबई : मनसे महापालिका प्रभाग क्रमांक-३१, जुईनगर आयोजित ‘एक सही संतापाची...' या उपक्रमात जुईनगर मधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आपला संताप व्यक्त केला. तसेच मतदार म्हणून त्यांच्या मताला काहीच किंमत राहिली नाही, अशी खंत देखील व्यवत  केली.

‘एक सही संतापाची...' अभियानमध्ये ३०० हुन जास्त नागरिकांनी सही करुन त्यांचा संताप व्यक्त केला. तसेच भविष्यामध्ये ‘मनसे'चे अध्यक्ष राजठाकरे महाराष्ट्राची धुरा सांभाळू शकतात, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘एक सही संतापाची...' अभियान प्रसंगी ‘मनसे'चे नवी मुंबई शहर सचिव सचिन कदम, उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांच्यासह विभाग अध्यक्ष अक्षय भोसले, उपविभाग अध्यक्ष अजय मोरे, मंगेश जाधव, शाखा अध्यक्ष मयुर कारंडे, संकेत बोडके, उपशाखा अध्यक्ष सुशांत घोरपडे, पवन बुधे, महिला सेना उपशहर अध्यक्षा अनिता नायडू, महिला उपविभाग अध्यक्षा विद्या इनामदार, विद्यार्थी सेना उपशहर अध्यक्ष प्रतिक खेडकर, विद्यार्थी सेना शाखा अध्यक्ष अक्षय शेळके तसेच महाराष्ट्र सैनिक श्रीकांत मुरकर, अर्जुन वाघमारे, सुरज कनोजिया, अर्जुन सोनवणे, आदि उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

मनसे'च्या दणवयानंतर महापालिकेला जाग