‘काँग्रेस'चे जवाब दो मोदी जवाब दो आंदोलन

 

१८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील ‘काँग्रेस'च्या कार्यकर्त्यांचे वाशीमध्ये जवाब दो मोदीजी आंदोलन

नवी मुंबई ः ‘भाजपा'चे ज्येष्ठ नेते सत्यपाल मल्लिक यांनी पुलवामा घटनेतून मोदी सरकारची पोलखोल केल्यानंतर ‘काँग्रेस'ने जवाब दो मोदीजी अशी देशव्यापी मोहीम सुरु केली आहे. त्याचा एक भाग म्हणून १८ एप्रिल रोजी नवी मुंबईतील ‘काँग्रेस'च्या कार्यकर्त्यांनी वाशीमध्ये जवाब दो मोदीजी अशी घोषणाबाजी करुन आंदोलन करण्यात आले.

पुलवामा घटनेत सी.आर.पी.एफ.ने हेलिकॉप्टर्सची केंद्र सरकारकडे मागणी केली होती. परंतु, गृह मंत्रालयाने हेलिकॉप्टर्स देण्यास नकार दिला. यामुळे जवानांना रस्ते मार्गाने निघावे लागले. त्यात ४० जवानांचा नाहक बळी गेला. ‘भाजपा'चे ज्येष्ठ नेते तथा जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मल्लिक यांनी यासंदर्भात गंभीर आरोप केले आहेत. एकंदरीतच केंद्र सरकारची निती बघता पुलवामात शहीद झालेल्या जवानांच्या मृत्युला मोदी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'चे अध्यक्ष अनिल कौशिक, प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी यावेळी केला. ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी'ने राज्यभर जवाब दो मोदी, जवाब दो आंदोलन घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ‘नवी मुंबई जिल्हा
काँग्रेस कमिटी'चे अध्यक्ष अनिल कौशिक यांच्या नेतृत्वात १८ एप्रिल रोजी वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जवाब दो आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक यांच्यासह कामगार नेते रवींद्र सावंत, तालुका अध्यक्ष सचिन नाईक, डॉ. मनोज उपाध्याय, अल्पंख्याक अध्यक्ष अन्वर हवालदार, माजी नगरसेवक बाबासाहेब गायकवाड, सुनील पारकर, साळवे, धोंडीराम पाटील, राजहंस भांबुरे तसेच वॉर्ड अध्यक्ष, जिल्हा कमिटी सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

तुटलेले बाकडे अन्‌ चालण्याच्या मार्गिकेवरील तुटलेल्या लाद्या बदलण्याची मागणी