दिवाळीत आनंदाबरोबर सुरक्षितताही जपा ! नॅशनल बर्न्स सेंटरचा नागरिकांना सावधतेचा सल्ला
नागपंचमी : पौराणिक आणि आधुनिक
आजचे नागपंचमीचे व्रत नाग प्रदेशातील एका तरी व्यक्तीशी संपर्क निर्माण करून करता येईल. दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबविणे. नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्या मध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरितक्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यांपैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ”धामण पाळा नी धान्योत्पादन वाढवा” अशा उद्घोषणेबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे.
एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशीही समजूत प्रचलित आहे आणि ती वास्तववादी आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियमाचे पालन करण्याची प्रथा आहे. श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आमचे संरक्षण कर अशी प्रार्थना करतात. अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते. मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय असे वेगळेच नाग सांगितले आहेत.
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणि भद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटक धनञ्जयौ
भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प, याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंका सारखे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले. कृषी संस्कृतीत नागाच्या पूजनाचे महत्त्व विशेष आहे. नाग आणि साप हे शेताचे रक्षणकर्ते आणि शेतकरी बांधवांचा मित्र मानला जातो. या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धत भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला दोरे बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेहंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.
पूर्वी नागपंचमीच्या सणापूर्वी ८ ते १० दिवस आधी गल्लीतील सर्व लहान थोर स्त्रिया एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या. झिम्मा-फुगडी, घोडा-चुईफुई, पिंगा-काटवटकाना, पिंगा इत्यादी खेळ मनसोक्त खेळायच्या. खेळता-खेळता उखाणे, गाणी म्हणून मनमोकळं करायच्या. आजही पध्दत ग्रामीण भागात जास्त प्रचलित आहे. त्यामुळे नागपंचमीला जास्त महत्व दिले जाते. दहन घाटावरती रात्रभर भजने होत असतात. या दिवशी महिला वर्तुळाकार आकार तयार करून झिम्मा-फुगडी सारखी नृत्ये व खेळ खेळतात. नारळ आणि लिंबू यांच्या या दिवशी शर्थी लावल्या जातात. म्हणजे विशिष्ट अंतरावर नारळ ठेवून त्यांच्या पलिकडे फेकण्याची शर्थ फार जुनी परंपरा आहे.
या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात, जमिनी शेणाने सारवितात, अंगणात रांगोळी काढतात, नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते. दूध-लाहया ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे. नागाच्या मंदिरात त्या दिवशी बाऱ्या सामुहिकरित्या म्हटल्या जातात. त्यामुळे एखाद्याला दंश झाला की त्या बाऱ्या म्हटल्याने विष सहज उतरते आणि जीव वाचतो असा समज आहे.
शिराळ्याची नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे तर परदेशांत ही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाख भर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीव प्रेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार २००२ मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना शासनाने बंदी केली. तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासन, जिल्हा कोर्ट, वन खाते आणि पोलिसांवर सोपविली. त्यामुळे रस्तो रस्ती सापांचे खेळ दाखविणे बंद करण्यात आहे नाहीतर नागपंचमीच्या आठवडयापासुन हे खेळ मोठमोठया शहरात बिनादिक्कत सुरु राहायचे. त्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात फक्त प्रतिकात्मक मिरवणूक काढली जाते. आजचे नागपंचमीचे व्रत नाग प्रदेशातील एका तरी व्यक्तीशी संपर्क निर्माण करून करता येईल. दात काढलेल्या आणि उपाशी ठेवून टोपलीतून आणलेल्या नागांचा छळ थांबविणे. नाग, सापांची उपयुक्तता घरोघरी, शाळा, महाविद्यालये यांच्या मध्ये जाऊन सांगितली पाहिजे. नागांमुळे उंदरांच्या संख्येवर नियंत्रण राहते. हरितक्रांतीची मनीषा पूर्ण व्हायची तर उंदरांच्या पोटात जाणारे धान्य वाचवावे लागेल. प्रत्येक तीन पोत्यांपैकी एक पोते उंदीर खातात. म्हणूनच नागपंचमीचे आधुनिक व्रत ”धामण पाळा नी धान्योत्पादन वाढवा” अशा उद्घोषणेबरोबरच ते कृतीतूनही व्हायला हवे. तरारून आलेल्या शेताकडे पाहून कृषी कन्यांना खूप आनंद होतो. मग त्या भविष्याची सुख- स्वप्ने पाहात उंच उंच झोके घेतात व हा सण साजरा करतात. या काळात मुलांनी मैदानी खेळ खेळावे, अशी जुनी प्रथाआहे. त्यासाठी मैदानी खेळांच्या स्पर्धा भरविण्याचा संकल्प श्रावणात धरावा व चातुर्मासात पूर्ण करावा. नाग पंथाचा इतिहास आणि त्यासंबंधी विविध कलांची माहिती घेणे.
नागपंचमी हा श्रावण महिन्यातील अत्यंत महत्वाचा सण आहे. यादिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागाला प्रसन्न करण्याची परंपरा आहे. नागाच्या मंदिरावर रोषणाई केली जाते, रात्रीपासुन पुजा-अर्चना केली जाते तर कुणाच्या मनसुबेचे निवारण केले जाते. मध्यप्रदेशातील पंचमढी येथे नागद्वारला भव्य अशी यात्रा भरवली जाते, ती पाहण्याजोगी असते. त्यादिवशी उपासक बाहेरचं साधं पाणी सुध्दा पीत नाही. उपवास सोडते वेळी कढई केली जाते, जी सर्वांना निमंत्रीतांना दिल्यानंतर उपवास सोडला जातो. इतका जटील उपवास असतो, जो ज्याला जमतो त्यालाच जमतो. सर्वसाधारण माणसं करुच शकत नाही, काटेकोरपणे पालन केले जाते. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यादिवसा पासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते, पण ते वास्तव नाही. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथसंप्रदायाच्या लोकांनी ही प्रथा प्रचलित करून गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करण्यासाठी भाग पाडतात.
प्राचीन ग्रीक आणि रोमन संस्कृतीत नाग नृत्याचा प्रचार असलेला दिसून येतो. या नृत्याचा संबंध सर्जनशक्तीशी मानला जातो. नागाचा आणि पृथ्वीचा एकमेकांशी असलेला पवित्र संबंध या संस्कृतींनी मान्य केला आहे. - प्रविण बागडे