आ. महेश बालदी आदिवासी बांधवांसोबत मथुरा, अयोध्या, काशी तिर्थयात्रेला रवाना

आ. महेश बालदी आदिवासी बांधवांसोबत तिर्थयात्रेला रवाना

पनवेल ः आपल्या मतदार संघातील आदिवासी वनवासी बांधवांना हिंदू तीर्थस्थळांचे दर्शन व्हावे या उदात्त हेतूने ‘उरण'चे आमदार महेश बालदी यांनी उरण मतदार संघातील १२५० आदिवासी बांधवांना २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत मथुरा अयोध्या काशी या तिर्थस्थळांची यात्रा आयोजित केली आहे. त्या अनुषंगाने या यात्रेला पनवेल रेल्वे स्थानकात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, ‘भाजपा'चे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. सदर स्तुत्य उपक्रमाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आ. प्रशांत ठाकूर यांनी आ. महेश बालदी यांचे कौतुक करत त्यांना तसेच यात्रेकरुंना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

 याप्रसंगी ‘भाजपा'चे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील,जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीताताई पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, अजय बहिरा, मुकीद काझी, माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, कामोठे संपर्क प्रमुख विनोद साबळे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी सरपंच सुभाष म्हात्रे, भाताचे सरपंच तानाजी पाटील, कुंडेवहाळचे सरपंच सदाशिव वास्कर, रेल्वे पोलीस निरीक्षक सीताराम राणा, करंजाडेचे सरपंच मंगेश शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, मंगेश वाकडीकर, धीरज ओवळेकर, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, कराडेचे माजी सरपंच विजय मुरकुटे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

उरण विधानसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात डोंगर कपारीत आदिवासी बांधव राहत आहेत. आदिवासी समाज रोजंदारी करत आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यामुळे आर्थिक परिस्थिती पाहता त्यांना तिर्थस्थळ किंवा सहलीला जाणेही कठीण असते. त्या अनुषंगाने त्यांच्याकडे अनेक राजकीय पक्षांनी कधीच लक्ष दिले नाही. मात्र, आ. महेश बालदी यांनी आदिवासी समाजाच्या अनेक समस्यांना दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आदिवासी वाड्या आणि पाड्यांवर मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. आपल्या मतदार संघातील आदिवासी बांधवांना हिंदू तिर्थर्थस्थळ दर्शन व्हावे म्हणून आमदार महेश बालदी यांनी मतदार संघातील आदिवासी बांधवांसाठी मथुरा अयोध्या काशी या तिर्थयात्रेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे यात्रेसाठी पक्षीय निकष न लावता सर्वांना संधी देण्यात आली आहे. या यात्रेकरुंची व्यवस्था बघण्यासाठी १०० स्वयंसेवक यात्रेकरुंबरोबर आहेत. सदर यात्रा पूर्णतः मोफत असून यात्रेच्या कालखंडात चहा, नाष्टा, जेवण तसेच राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांच्या या अनोख्या उपक्रमामुळे आदिवासी समाजात आनंदाची भावना व्यक्त झाली आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

तरुणांना प्रेरणा देण्याचे सामाजिक कार्य - लोकनेते रामशेठ ठाकूर