रवींद्र सावंत ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या प्रवक्तेपदी नियुवत

नवी मुंबई ः ‘महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस'चे अध्यक्ष नाना पटोले यांनी ‘नेरुळ तालुका ब्लॉक काँग्रेस'चे अध्यक्ष तथा ‘नवी मुंबई इंटक'चे अध्यक्ष
रवींद्र सावंत यांची ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या प्रवक्तेपदी निवड केली आहे.

नवी मुंबई शहरात जनआंदोलन, निदर्शने तसेच समस्यांचा पाठपुरावा या माध्यमातून रवींद्र सावंत यांनी काँग्रेस पक्षाचे नाव सातत्याने चर्चेत
ठेवून पक्षाचा जनाधार वाढविण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी पक्षाच्या सुचनेनुसार रवींद्र सावंत यांनी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या बंगल्यासमोर निदर्शने केली होती. सदर आंदोलन ‘काँग्रेस'च्या नवी मुंबईतील अन्य कोणत्याही नेत्याला आणि पदाधिकाऱ्याला जमली नाही. याशिवाय सायन-बेलापूर मार्गावर रास्ता रोको, जुईनगरच्या तलावात उतरुन केलेले आंदोलन, नेरुळ नोडमध्ये प्रत्येक विषयावर रस्त्यावर उतरुन केलेले आंदोलन यामुळे रवींद्र सावंत यांनी नेहमीच काँग्रेस पक्ष संघटना चर्चेत ठेवलेली आहे. ‘नवी मुंबई इंटक'च्या माध्यमातून एमआयडीसी, महापालिका, एपीएमसी मधील कर्मचाऱ्यांसह खासगी कंपन्या-कारखान्यांतील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविताना रवींद्र सावंत यांनी कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर ‘काँग्रेस'कडे वळविला आहे.

प्रसिध्दी माध्यमांमध्ये चर्चासत्र, वादविवाद यामध्ये सहभागी होऊन रवींद्र सावंत यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका यांनी ठामपणे मांडताना पक्षकार्य जनताभिमुख करण्याचे काम केले आहे. एकंदरीतच रवींद्र सावंत यांची काँग्रेस पक्षाप्रती असलेली एकनिष्ठा आणि कार्य पाहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सावंत यांच्यावर विश्वास दाखवित त्यांच्यावर ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली आहे. दरम्यान, रवींद्र सावंत यांच्या सदर नियुक्तीचे ‘काँग्रेस'च्या पदाधिकाऱ्यांनी, माजी नगरसेवकांनी, कार्यकर्त्यांनी, कामगारांनी उत्साहाने स्वागत करुन त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

उरण तालुक्यात ठिकठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये सरळ, तिरंगी, चौरंगी आणि बहुरंगी लढत