गणेशोत्सवापूर्वी गोवा महामार्ग खड्डेमुक्त -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय, तो त्रास होवू नये, यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पनवेल येथे केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २६ ऑगस्ट रोजी मुंबई-गोवा महामार्गावरील सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आ. प्रशांत ठाकूर, आ. भरत गोगावले, आ. महेंद्र थोरवे, आ. महेंद्र दळवी, आ. रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त पी. वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, प्रभारी नवी मुंबई पोलीस आयुवत संजयवुÀमार येनपुरे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुवत तिरुपती काकडे, ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण'चे प्रकल्प संचालक घोटकर, ‘पीडब्ल्यूडी'च्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रुपाली पाटील, प्रांताधिकारी राहुल मुंडके, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर खुटवळ तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पनवेल पळस्पे येथून मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांच्या कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली आणि कशेडी घाटातील भोगांव येथील बोगद्याच्या ठिकाणी या पाहणी दौऱ्याची सांगता झाली.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम-६० आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम-६० पध्दत आणि तिसरी डीएलसी पध्दत या तीन आधुनिक पध्दतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरु आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम-६० या पध्दतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पध्दतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेटस्‌ बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे. या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच महामार्गाचे उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण'चे अधिकारी, ‘पीडब्ल्यूडी'चे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पध्दतीने कुठे काम करायचे, ते आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरु आहे. जरी मी मुख्यमंत्री असलो तरी एक सामान्य कार्यकर्ता आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे यांनी जे जुने कंत्राटदार काम सोडून पळाले आहेत, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना दिले. 

तब्बल १५५ किलोमीटर रस्त्याच्या पाहणीदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी पळस्पे, गडब, कोलाड, माणगांव, लोणेरे फाटा आणि कशेडी बोगदा या ठिकाणी सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामांची भर पावसात पाहणी केली.  शेवटी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी या महामार्गावरील रस्त्यांची राहिलेली कामे तातडीने पूर्ण करण्याविषयी निर्देश दिले. 

दरम्यान, सदर पाहणी दरम्यान ‘रायगड प्रेस वलब'च्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याविषयीचे निवेदन दिले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 महापुरुषांच्या पुतळ्याचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची ‘युवा सेना'तर्फे मागणी