मनपाचा प्रकल्पात भूमिपुत्रांना प्राधान्य द्या
नवी मुंबई -: नवी मुंबई शहर वसवण्यासाठी येथील भूमिपुत्रांची १००% जमीन संपादित केली आहे. त्यामुळे येथील सर्व भूमिपुत्र भूमिहीन झाले आहेत. त्यामुळे शेती गेल्याने बऱ्याच भूमिपुत्रांचा उदर निर्वाहाचा प्रश्न जटिल झाल्याने बऱ्याच जणांचे शिक्षण अपूर्ण राहिले आणि हीच अवस्था जूहुगावाची असून अनेक तरुण आज बेरोजगार आहेत. त्यामुळे नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने जुहुगाव परिक्षेत्रात जे जे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात जुहुगावातील तरुणांना नोकरीसाठी प्रथम प्राधान्य द्यावे अशी मागणी भाजप बेलापूर मंडल अध्यक्षा शीतल भोईर यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे.