एक्झाम वॉरियर्स भव्य चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे जगामध्ये भारताचा सन्मान वाढला-  आ. गणेश नाईक

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण जगात भारताचा सन्मान वाढला असून सामर्थ्यवान पिढी घडत असल्याचे चित्र देशात दिसते आहे", असे प्रतिपादन  आमदार गणेश नाईक यांनी केले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या 'परीक्षेपे चर्चा' या उपक्रमांतर्गत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने एक्झाम वॉरियर्स भव्य चित्रकला स्पर्धा 24 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन कल्पकतेने चित्रे रेखाटली.

वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ अतिशय उत्साहात विद्यार्थी आणि पालकांच्या भरगच्च उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी आमदार गणेश नाईक ,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील ,माजी खासदार संजीव नाईक , माजी आमदार आणि श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संदीप नाईक, भाजपाचे नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपाच्या समन्वयक प्राध्यापिका वर्षा भोसले, आंतरराष्ट्रीय खोखोपटू शितल भोर, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी नगरसेविका माधुरी सुतार, नेत्रा शिर्के यांच्यासह मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, खेळ, कला, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार नाईक यांनी भारताची आर्थिक प्रगती पाहता भविष्यामध्ये आपला देश आर्थिक महासत्ता झाला तर नवल वाटायला नको असे सांगितले. 2014 नंतर मोदी यांनी देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा खांद्यावर घेतल्यानंतर जनसामान्यांसाठी अनेक प्रभावी योजना आणल्या. उज्वला योजनेमधून गाव खेड्यातल्या महिला भगिनींना गॅस उपलब्ध करून दिला. आरोग्याच्या योजनांमधून लाखो नागरिक मोफत वैद्यकीय उपचारांचा लाभ घेत आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेमध्ये सूक्ष्म लघु , मध्यम उद्योगांना बळ दिले जात आहे. विद्यार्थी, युवक, ज्येष्ठ, महिला सर्वच घटकांच्या सक्षमीकरणाचे काम सुरू आहे.  

कोरोनाच्या संकटकाळात वैज्ञानिकांना पंतप्रधानांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे भारताने स्वदेशी कोविड लस उत्पादित केली. ती जगातल्या अन्य देशांनाही दिली. भारताचे सैन्य सामर्थ्य वाढविल्याने शत्रू राष्ट्रांना भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होत नाही. पंतप्रधानांच्या प्राधान्यक्रमामध्ये विद्यार्थी वर्ग हा अग्रस्थानी असून एक सामर्थ्यवान पिढी घडवण्याचे काम देशांमध्ये सुरू असल्याचे मत लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी मांडले. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी आपल्या प्रास्ताविक पर संबोधनांमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या विचारानुसार परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांच्या मनातील दडपण , ताणतणाव दूर करण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.  पंतप्रधानांनी अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले परंतु देशातल्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे याची काळजी ते घेत आहेत. परीक्षेपे चर्चा या उपक्रमांतर्गत पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनात आत्मविश्वासाची पेरणी करत असतात. पंतप्रधानांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर या पुस्तकाचे विद्यार्थ्यांनी आवर्जून वाचन करावे असे आवाहन संजीव नाईक यांनी केले.

महामंत्री विक्रांत पाटील यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशांमध्ये अतिशय सकारात्मक वातावरण असल्याचे नमूद करून 2014 नंतर नव भारताच्या निर्मितीचे काम सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधानांनी विकासाच्या नव संकल्पना राबवून जगामध्ये भारताला शक्तिशाली देशाचा सन्मान मिळवून दिला आहे.

स्पर्धेमधील विजेता विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र आणि आकर्षक पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत.

स्पर्धेतील बक्षीस विजेते विद्यार्थी आणि शाळा

प्रथम तीन क्रमांक- स्वरा संदेश पाटील शेतकरी विद्यालय घनसोली, अनिकेत राजेश जानकर रा फ नाईक विद्यालय कोपरखैरणे आणि श्रावणी संदीप भगत श्रीराम विद्यालय ऐरोली.

उत्कृष्ट कलाकृती पारितोषिके- ममता रिंकू पटेल नवी मुंबई विद्यालय वाशी, शर्वरी बयाजी कदम श्रीराम विद्यालय ऐरोली, कुणाल संतोष मोरे रा फ नाईक विद्यालय कोपरखैरणे, समीक्षा विठ्ठल चिकने ज्ञानविकास संस्था कोपरखैरणे, संपदा देवदास पांगारकर नवी मुंबई पालिका शाळा 103 ऐरोली, प्रीती भैया राम यादव विवेकानंद विद्यालय सानपाडा, मधुरा सुनील जाधव नवी मुंबई पालिका शाळा 114 कोपरखैरणे, अनुक्षा दीपक पवार शेतकरी शिक्षण संस्था घणसोली, राधिका लक्ष्मण चौगुले नवी मुंबई पालिका शाळा 105 घणसोली आणि स्मिता शांताराम आव्हाड मॉडर्न स्कूल वाशी.

उत्तेजनार्थ बक्षीस पात्र विद्यार्थी- श्रुती शंकर खुस्पे ज्ञानविकास संस्था कोपरखैरणे सारा बिलाल ठाकूर रा फ नाईक विद्यालय कोपरखैरणे, विनायक  निवडूंगे न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली सोमय्या खान श्रीराम विद्यालय ऐरोली रूपाली सुरेश आचारी नवी मुंबई पालिका शाळा १०५ घणसोली प्रणाली काशिनाथ पिसे शेतकरी विद्यालय घनसोली दिया विनोद फुले राधिका बाई मेघे विद्यालय ऐरोली, श्वेता शंकर चव्हाण नवी मुंबई शाळा 105 घणसोली, धनेश सुभाष सूळ न्यू बॉम्बे सिटी स्कूल घणसोली, आर्या सुहास झोरे नवी मुंबई विद्यालय कोपरी गाव, अथर्व सुरेश खराटकर नवी मुंबई विद्यालय कोपरी गाव, मंदार चिंतामण भामरे आयइएस वाशी,  सुहानी युवराज सिंह श्रीराम विद्यालय ऐरोली, कीर्ती मधुकर पाटील रा फ नाईक विद्यालय, अभिलाषा अंकुश डोईफोडे ज्ञानविकास संस्था, अर्जुन रिंकू पटेल नवी मुंबई विद्यालय, कुणाल विनायक दळवी हिंदी हायस्कूल सानपाडा, रिमु तिलकधारी पटेल नवी मुंबई शाळा 106 कोपरखैरणे, मल्लिकार्जुन शंकर शिंगे नवी मुंबई पालिका शाळा चिंचपाडा, सुष्मिता नाईक मॉडर्न स्कूल वाशी, निशा शशिकांत शिर्के नवी मुंबई पालिका शाळा ११४ कोपरखैरणे, ऋतुजा अशोक नरवडे रा फ नाईक विद्यालय आणि स्मिता शांताराम आव्हाड मॉडर्न स्कूल वाशी.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरातील लाखो विद्यार्थ्यांशी ‘परीक्षापे चर्चा'